तºहावद पुनर्वसन वसाहतीत १५ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:28 IST2020-06-18T12:27:18+5:302020-06-18T12:28:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील तºहावद पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरल्यामुळे १५ घरांचे नुकसान झाले ...

Damage due to water intrusion in 15 houses in Tahavad Rehabilitation Colony | तºहावद पुनर्वसन वसाहतीत १५ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान

तºहावद पुनर्वसन वसाहतीत १५ घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : तालुक्यातील तºहावद पुनर्वसन वसाहतीत मंगळवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी शिरल्यामुळे १५ घरांचे नुकसान झाले आहे. महासूल कर्मचाऱ्यांनी पंचनाम्याचे काम हाती घेताले आहे. परंतु पावसळ्या पूर्वी नाला खोलीकरण काम हाती घेण्याची मागणी करून ही सबंधीत यंत्रना दुर्लक्ष करित असल्याने बाधितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मंगलवारी मध्य रात्री नंतर तलोळा तालुक्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावाल्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांनादेखील पाणी आले. सरदार सरोवर प्रकल्पात बाधित झालेल्या तºहावड येथील वसाहतीतील घरांमध्ये पाणी शिराले. १५ घरामध्ये पाणी शिराल्याचे बाधितांनी सांगितले. यात त्यांच्या संसारोपयोगी साहित्या बरोबाराच गहू, तांदूळ, ज्वारी असे अन्न धान्याचे नुकसान झाले आहे. रात्र भर विस्थापित कुटुंबानी घरातील पाणी काढले. याबाबत बुधवार रोजी माहसूल प्रशासनास माहिती दिल्यानंतर तलाठ्यांनी पुनर्वसन वसाहतीत भेट देवून पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. आधिच गेल्या आठवड्यात वादळीवाºयाने घरांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत नाही, तोच पुन्हा मुसळधार पावसाने घराचे नुकसान केले. त्यामुळे बाधितांची चिंता वाढली आहे. शासन तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.

Web Title: Damage due to water intrusion in 15 houses in Tahavad Rehabilitation Colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.