नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 12:24 IST2019-08-02T12:23:57+5:302019-08-02T12:24:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : रायखेडसह परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसात नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान ...

नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : रायखेडसह परिसरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसात नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यात पिकासह शेतातील मातीही वाहून गेली. दरम्यान, जिनींग फॅक्टरी मालकाने नाला बंद केल्याने हा प्रकार झाल्याचा आरोप शेतक:यांनी केला आहे.
याबाबत वृत्त असे की, रायखेड शिवारात कापूस जिनिंग, रॉ होऊसचे बांधकाम सुरू आहे. सुरू असलेल्या बांधकामाजवळ नाला आहे. संबंधित जिनिंगच्या मालकाने वाहतुकीसाठी या नाल्यावर पाईप टाकून किंवा फरशी पूल बांधणे गरजेचे होते. परंतु संबंधित व्यापा:याने नाल्यात माती टाकून रस्ता तयार करून नाला बंद केला आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला बंद असल्याने नाल्याचे पाणी थेट शेतात जाऊन पिकासह शेतातील काळी कसदार माती वाहून शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची घटना घडली. यात खेडदिगर येथील राजेश प्रकाश पाटील यांच्या मालकीची रायखेड शिवारातील गट नंबर 27 मधील तीन एकर क्षेत्र रायखेड येथील वासुदेव माधव पाटील यांनी भाडे तत्त्वावर शेती केली होती. त्यात या शेतात शेणखत, बियाणे, इतर खते व गाळ टाकला होता. त्यात त्यांचे तीन ते चार लाख रुपये खर्च झाले होते. हा झालेला खर्च व येणारे उत्पन्नावर नाल्याचे पाणी थेट शेतात गेल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. जवळच असलेल्या ब्राrाणपुरी येथील शेतकरी शिवदास वेडू पाटील यांनी आपल्या रायखेड शिवारात पपईची लागवड केली होती. त्या शेतातही नाल्याचे पाणी गेल्याने त्यांचेही नुकसान झाल्याचे समजते. नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने राजेश प्रकाश पाटील यांचे मोठे नुकसान झाले असून माधव मंगेश पाटील, शिवदास वेडू पाटील, सुरेश रामदास पाटील, हेमंत चुनिलाल पाटील, सण्या पुण्या मोरे व नारायण देविदास पाटील या शेतक:यांच्या शेताचेही नुकसान झाले आहे. संबंधित जिनींग फॅक्टरी मालकाने स्वत:च्या हितासाठी नाला बंद केल्याने ते पाणी थेट आमच्या शेतात आल्याने आमचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा या शेतक:यांनी व्यक्त केली आहे. याबाबत महसूल विभागाने पंचनामा करून हा नाला व रस्ता ज्या विभागाच्या अखत्यारीत आहे त्यांनी संबंधित व्यापा:याला समज देऊन नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतक:यांसह इतर शेतक:यांनी केली आहे.