तळोद्यात प्लॅस्टिक खरेदीसाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:20 IST2021-06-23T04:20:43+5:302021-06-23T04:20:43+5:30
राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची गरज नंदुरबार : वाका ते नंदुरबारदरम्यान राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी ...

तळोद्यात प्लॅस्टिक खरेदीसाठी गर्दी
राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची गरज
नंदुरबार : वाका ते नंदुरबारदरम्यान राकसवाडे चाैफुलीवर उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे. याठिकाणी काही दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता. यानंतरही येथे गतिरोधक किंवा इतर उपाययोजना करण्याबाबत उदासीनता आहे.
नागरिकांना वनमहोत्सवाची प्रतीक्षा
नंदुरबार : जिल्ह्यात वृक्षलागवडीची चळवळ यंदाही सुरू ठेवण्याचा पर्यावरणवादी नागरिकांचा मानस असून, वनविभागाने सालाबादाप्रमाणे यंदाही वनमहोत्सवाचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत नागरिकांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात येते. गेल्या काही काळात वृक्षलागवडीबाबत जागरूकता वाढत असून, झाडे जगण्याची टक्केवारीही वाढत आहे.
बसफेऱ्या वाढविण्याची मागणी कायम
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव शहर व तालुक्यातील मोठ्या गावांसाठी नंदुरबार व शहादा आगारातून बसेस सुरू व्हाव्यात, अशी मागणी आहे. कोरोनानंतर या तालुक्यात बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
पूर्वभागात दमदार पावसाची प्रतीक्षा
शनिमांडळ : तालुक्याच्या पूर्वभागातील शनिमांडळ परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. या भागात पेरणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परंतु दमदार असा पाऊस येऊन जमिनीची वाफ झालेली नसल्याने शेतकरी पेरण्यांसाठी थांबले आहेत.
दुर्गम भागात मास्क वापराबाबत जागृती
धडगाव : सातपुड्याच्या दुर्गम भागातील धडगाव तालुक्यात मास्क वापराबाबत जागृती होत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांकडून बाजारपेठेत येताना मास्क किंवा तत्सम कापड तोंडावर बांधले जात असल्याचे दिसून येत आहे. धडगाव तालुका हा कोरोनामुक्त तालुका म्हणून घोषित आहे. असे असले तरीही नागरिकांकडून पूर्णपणे उपाययोजना राबवण्यावर भर देण्यात येत आहे.
जलनमुने तपासावेत
नंदुरबार : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींतर्गत जलनमुने तपासून त्यांचा अहवाल देण्याची अपेक्षा आहे. पावसाळ्यापूर्वी सर्व ग्रामपंचायतींचे पिण्यायोग्य पाण्याची तपासणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात जलजन्य आजारांची सर्वाधिक भीती असते.
रोजगार मिळाला
नंदुरबार : शेतकामांना सुरुवात झाल्याने ग्रामीण व शहरी भागातील शेतीपूरक उद्योगांनाही चालना मिळत आहे. यात नांगर व इतर शेतीसाहित्य तयार करणारे कारागीर, फवारणी पंप दुरुस्त करणारे कारागीर तसेच ट्रॅक्टरचालकांना रोजगार मिळत असल्याचे दिसून आले आहे. मजुरांनाही रोजगार मिळत आहे.
ग्रामीण भागात साफसफाईची गरज
नंदुरबार : जिल्ह्यात पावसाळ्यात गटारी व सांडपाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याने रोगराईची भीती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी त्या त्या गावांमधून करण्यात आली आहे.
करण चाैफुलीवर पुन्हा वाढले खड्डे
नंदुरबार : शहरातील करण चाैफुलीवर पुन्हा खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाळ्यात अधिक धोकेदायक व अपघाती ठरण्याची शक्यता आहे. प्रशासनाने खड्डे बुजवून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.