साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 12:57 IST2020-02-06T12:46:35+5:302020-02-06T12:57:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला ...

साठा करण्यास जागा नसल्याने कापूस खरेदी बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पाच वर्षानंतर जिल्ह्यातील कापूस खरेदी केंद्रांमधून सीसीआयने विक्रमी दोन लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ यातून समाधान व्यक्त होत असताना दोन्ही केंद्रातून दिल्लीकडे गाठी निर्यात होणे थांबल्याने नवीन कापूस साठा करण्यासाठी जागा नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी थांबवली आहे़ परिणामी दोन्ही केंद्रात हजारो कापसाच्या गाठी पडून आहेत़
नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथील राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रातून सीसीआयने ५१ हजार क्विंटल तर शहादा येथे १ लाख १० क्विंटल कापूस खरेदी केला आहे़ खरेदी केलेल्या कापसाच्या जिनिंगमधून गाठी तयार करुन त्या निर्यातीचे धोरण सीसीआयचे आहे़ परंतू देशातील कापसाची खरेदी करणाऱ्या चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे़ यातून भारत-चीन व्यापार संबधात आयात निर्यातवर निर्बंध आल्याने त्याचा परिणाम म्हणून कापूस गाठींचा साठा दिवसेंदिवस वाढत आहे़ नंदुरबार येथील जिनिंगमध्ये आजअखेरीस १ हजार कापूस गाठी पडून असल्याची माहिती आहे़ तर शहादा येथील जिनिंगमध्ये गाठींची संख्या प्रचंड वाढल्याने ठेवण्यासाठी भाडोत्री गोदाम शोधण्याची वेळ संबधितांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार येथील केंद्रात जागाच नसल्याने पाच दिवसांपासून तर शहादा येथे तब्बल आठ दिवसांपासून खरेदी बंद आहे़ गोडावून मिळाल्यानंतर पुढील खरेदीची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे़ येत्या काळात पुन्हा अशी स्थिती उद्भवू नये यासाठी सीसीआय वाढीव गोडावून भाड्याने घेण्याच्या प्रयत्नात आहे़
दरम्यान सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाचे देण्याबाबत अडचणी येत असल्याने कापूस खरेदी बंद झाल्याची माहिती समोर आली होती़ परंतू शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यात येत असल्याने तसा कोणताही प्रकार नसल्याचे सीसीआय आणि बाजार समित्यांकडून स्पष्ट केले आहे़
नंदुरबार बाजार समितीत यंदा कापसाला प्रतीक्विंटल ५ हजार २०० ते ५ हजार ५४० या दरम्यान दर देण्यात आले आहेत़ यातून ५१ हजार क्विंटल कापूस सीसीआयने खरेदी केला आहे़ पळाशी येथील केंद्रावर सीसीआयसोबत खाजगी चार परवानाधारकांकडून खरेदी केली जाते़ परंतू सीसीआयने सर्वाधिक भाव दिल्याने शेतकºयांनी त्यांच्याकडे कापूस विक्रीला प्राधान्य दिले होते़ गेल्या काही दिवसात खरेदी केलेल्या गाठींची निर्यात झालेली नसल्याने त्या पडून आहेत़ यातून मग साठवण्यासाठी जागा मिळत नसल्याने सीसीआयने कापूस खरेदी बंद केली आहे़ खरेदी बंद असल्याच्या काळात सीसीआय आणि बाजार समितीने जिल्ह्यातील विविध भागात साठा कºरण्यासाठी गोडावूनचा शोध सुरु केला आहे़ याला अद्याप यश आलेले नसल्याची माहिती आहे़