शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कापूस उत्पादकांना यंदा दिलासा सप्टेंबर अखेरपर्यंत विक्री करता येईल कापूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी होणारी गर्दी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची कापूस विक्रीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता यंदा सीसीआयचे खरेदी केंद्र हे ३० सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार कापूस खरेदी     केंद्रावर दररोज चार ते पाच हजार क्विंटल कापूस खरेदी होत आहे. भाव देखील समाधानकारक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीपासूनच कापूसला यंदा चांगला भाव मिळत आहे. शेतकरी कापूस विक्रीसाठी देखील घाई करीत असल्याचे दिसून येत आहे. यंदा एक लाख हेक्टरयंदा जिल्ह्यात एक लाख हेक्टर कापूस लागवड झाली आहे. परंतु अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कापसाच्या उत्पादनावर यंदा परिणाम झाला आहे. कापूसची क्वाॉलीटी देखील खराब झाली असल्याचे चित्र होते. परंतु आता नंतर निघणारा कापूस हा चांगला दर्जाचा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. विक्रीसाठी झुंबडसीसीआयच्या विक्री केंद्रांवर कापूस विक्रीसाठी झुंबड उडत आहे. दररोज २०० पेक्षा अधीक वाहने विक्रीसाठी येत आहेत. साधारणत: पाच हजारापेक्षा अधीक कापूस येथे खरेदी होत आहे. होणारी गर्दी आणि त्यामुळे तोलाईसाठी लागणारा विलंब यामुळे शेतकरी नाराज होतात. त्यातून वाद देखील होत आहेत. ही बाब लक्षात घेता यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत कापूस खरेदी करण्याचा निर्णय सीसीआयने घेतला आहे. भाव समाधानकारककापसाला यंदा भाव बऱ्यापैकी मिळत आहे. चांगल्या दर्जाचा कापूस पाच हजार ७५० रुपयेपर्यंत विक्री होत आहे. तर कमी दर्जाचा कापूस हा किमान  पाच हजार ४३० रुपये क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. खाजगी व्यापारींकडून अर्थात खेडा खरेदीत देखील साडेपाच हजारापर्यंत भाव मिळत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी चांगला दर्जाचा कापूस आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. कमी दर्जाचा कापसाला सीसीआयच्या नियमानुसार कमी भाव द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा वाद देखील होतात. ते टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगला कापूस विक्रीसाठी आणावा असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीकसीसीआयच्या नंदुरबार व शहादा केंद्रात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत अधीक खरेदी झालेली आहे. ती आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. सद्या वाढलेली आवक पहाता आणखी नऊ महिने खरेदी सुरू राहणार आहे.