कोरोनामुळे महसुली वसुलीचे उद्दिष्ट यंदा राहिले अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST2021-05-05T04:49:54+5:302021-05-05T04:49:54+5:30
नंदुरबार जिल्ह्यात साधारण १८ प्रकारच्या विविध करांची वार्षिक वसुली ३६ महसूल मंडळांत नियुक्त करण्यात आलेल्या तलाठ्यांकडून ३१ मार्च अखेर ...

कोरोनामुळे महसुली वसुलीचे उद्दिष्ट यंदा राहिले अपूर्ण
नंदुरबार जिल्ह्यात साधारण १८ प्रकारच्या विविध करांची वार्षिक वसुली ३६ महसूल मंडळांत नियुक्त करण्यात आलेल्या तलाठ्यांकडून ३१ मार्च अखेर करण्यात येते. यात गौण खनिज, रोजगार हमी, घरपट्टी, पाणीपट्टी, मनोरंजन, शिक्षण, जमीन महसूल, शेतसारा, आदींचा समावेश आहे. २०१९-२०२० या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने दिलेले ३८ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, अशी शक्यता होती. परंतु, याउलट महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरीस जिल्ह्यात ४४ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची वसुली केली होती. उद्दिष्टापेक्षा १६ टक्के अर्थात ११६.०९ टक्के वसुली जिल्ह्यातून करण्यात आली होती.
जिल्ह्यातून गेल्या वर्षात वसुलीमुळे शासनाकडून २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याला ५८ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट
नंदुरबार जिल्ह्यात साधारण १८ प्रकारच्या विविध करांची वार्षिक वसुली ३६ महसूल मंडळांत नियुक्त करण्यात आलेल्या तलाठ्यांकडून ३१ मार्च अखेर करण्यात येते. यात गौण खनिज, रोजगार हमी, घरपट्टी, पाणीपट्टी, मनोरंजन, शिक्षण, जमीन महसूल, शेतसारा, आदींचा समावेश आहे. २०१९-२०२० या वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर शासनाने दिलेले ३८ कोटी ९९ लाख रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही, अशी शक्यता होती. परंतु, याउलट महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मार्च अखेरीस जिल्ह्यात ४४ कोटी १२ लाख ६० हजार रुपयांची वसुली केली होती. उद्दिष्टापेक्षा १६ टक्के अर्थात ११६. ०९ टक्के वसुली जिल्ह्यातून करण्यात आली होती. जिल्ह्यातून गेल्या वर्षात वसुलीमुळे शासनाकडून २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याला ५८ कोटी ४२ लाख रुपयांचे उद्दिष्ट मिळाले होते. परंतु, मार्च २०२१ अखेरीस केवळ ५६ कोटी ६७ लाख ९१ हजार रुपयांची वसुली जिल्ह्याला करता आली आहे. केवळ ९७ टक्के वसुली झाल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत जिल्हा यंदा मागे असल्याचे दिसून आले आहे. विशेष बाब म्हणजे फेब्रुवारी ते मार्च २०२० या काळात कोरोना सोबत लढण्याची तयारी सुरू असतानाही महसूल विभागाने १०० टक्क्यांपेक्षा अधिक वसुली केली होती. परंतु, यंदा मात्र कोरोनामुळे कर्मचारी बाहेर पडू न शकल्याने वसुली कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.