कोरोनामुळे अक्कलकुव्यात शासकीय कार्यालयाचे दरवाजे ‘सामान्यांना बंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:35 IST2020-06-26T12:35:18+5:302020-06-26T12:35:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद ...

कोरोनामुळे अक्कलकुव्यात शासकीय कार्यालयाचे दरवाजे ‘सामान्यांना बंद’
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरातील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात कोरोनाच्या धास्तीमुळे अधिकाऱ्यांनी कामानिमित्त येणाºया सामान्य नागरिकांसाठी दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे़ दरवाजांऐवजी प्रशासनाने सुरु केलेली एकखिडकी योजना कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपयुक्त ठरत असली तरी अडगळीत असलेल्या खिडकीला लोंबकणारे नागरिक मात्र यामुळे त्रस्त झाले आहेत़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन महिने शासकीय कार्यालयांचे कामकाज बंद होते़ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सर्व कार्यालयात अधिकारी व कर्मचाºयांची १०० टक्के उपस्थिती देऊन कामकाज सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ यानुसार शहरात कार्यालये सुरु झाली असून तुरळक स्वरुपात नागरीक येऊ लागले आहेत़ शहरातील तालुका निरीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातही नागरिकांची ये-जा सुरु झाली आहे़ परंतु इतर कार्यालयांच्या तुलनेत येथील अधिकाºयांनी कोरोनामुक्तीचा अजब फंडा शोधून काढत बाहेरुन येणाºया कोणत्याही नागरिकाला प्रवेशच देऊ नये असे आदेश काढले आहेत़ यातून मग शेती संबधित दस्त, गाव नकाशे, ले-आऊट, बांधकाम परवानगी संबधी कागदपत्रांची पूर्तता यासह विविध कामांसाठी येणाºया नागरिकांना खिडकीतून आपले म्हणणे मांडून तेथून कागदपत्रे देण्याचा निर्णय घेतला़ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य असलेल्या निर्णयात मात्र सुविधा निर्माण करण्याचा अधिकारी आणि कर्मचाºयांना विसर पडला आहे़ येणारे नागरिक कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बोळीतून भिंतीला लटकून खिडकीला लोंबकळत आपले मांडत असल्याचे चित्र याठिकाणी दरदिवशी दिसून येत आहे़ या बोळीत गवत, कचरा, घाण साचून आहे़ यात सापांची भिती असतानाही नागरिक नाईलाजाने खिडकीला लटकून म्हणणे मांडत आहेत़
शहरातील इतर शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी मास्क, सॅनेटायझरचा वापर करुन येणाºयांसोबत संवाद करत असताना भूमी अभिलेख कार्यालयातील या प्रकारामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे़ हा आदेश नेमका कोणी काढला, याबाबत अधिकारी व कर्मचारी बोलण्यास तयार नाहीत़ कार्यालयात कोणी येऊ नये म्हणून सकाळ ते सायंकाळ दोन शिपाई वर्गीय कर्मचारी दारात थांबवून ठेवण्यात येतात़ केवळ याच कार्यालयात सुरु असलेल्या या प्रकाराकडे जिल्हा प्रशासनाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे़