कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:24+5:302021-02-14T04:29:24+5:30
निवेदनात म्हटले आहे की, गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायित्व आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समायोजन करावे
निवेदनात म्हटले आहे की, गरीब दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेस सहज साध्य परवडण्याजोगी कार्यक्षम उत्तरदायित्व आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने देशात १२ एप्रिल२००५ पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू केले आहे. या अभियानमधील कंत्राटी कर्मचारी गरजूंना आरोग्य सेवा देत आहेत. तसेच कोरोना विषाणूच्या जागतिक महामारीत चांगली कामगिरी राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील कंत्राटी कर्मचारी करीत आहेत. याकाळात दुर्दैवाने काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजन करणे आवश्यक आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांनी आरोग्य विभागात हजारो रिक्त पदे असून, ते लवकरच भरणार असल्याची माहिती दिली, पण आधीच कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागात काम करत आहेत. त्यांना वर्षानुवर्षे त्याच कामाचा अनुभवही आला आहे. जर हेच कंत्राटी कर्मचारी कायम समायोजन केले तर त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण द्यावे लागणार नाही. त्यामुळे राज्य शासनाचा वेळ आणि पैसा वाचेल. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित शासन सेवेत समायोजन करण्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ नंदुरबार शाखेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.