माळी समाजात विधवा महिलांच्या पुनर्विवाहास संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:27+5:302021-07-23T04:19:27+5:30
माळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा माळी समाज कार्यालयात घेण्यात आली होती. या सभेला समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

माळी समाजात विधवा महिलांच्या पुनर्विवाहास संमती
माळी समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा माळी समाज कार्यालयात घेण्यात आली होती. या सभेला समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी पंचांचे अध्यक्ष अरविंद मगरे होते. या वेळी उपाध्यक्ष सुधीरकुमार माळी, सचिव उखा पिंपरे, सदस्य ईश्वर मगरे, लक्ष्मण सागर, भगवान मगरे, अनिल मगरे, सुरेश चव्हाण, हेमलाल मगरे, योगेश्वर पंजराळे, अजित टवाळे, संजय माळी, सुनील सूर्यवंशी, राजेश कर्णकार, अरुण कर्णकार, बालू राणे, पंकज राणे, पंकज शेंडे, किरण राणे, रत्नाकर शेंडे, शिरीष माळी, अतुल सूर्यवंशी, संतोष कर्णकार, शशिकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. याशिवाय, पंचांचे माजी अध्यक्ष गिरधर सागर, वरिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ शशिकांत मगरे, अनिल पिंपरे, दीपक मगरे, डॉ. देविदास शेंडे, मोहन सूर्यवंशी, जयेंद्र सूर्यवंशी, राजाराम राणे, पवन मगरे, सुमित लोखंडे, मुकुंदा कर्णकार, अनिल मगरे यासह समाजातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा बंद करण्यासाठी चर्चा करण्यात आली. याशिवाय, लग्नकार्यातील अनावश्यक रुढी, परंपरा बंद करून अनाठायी खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला.
सभेसाठी पंचांचे सेक्रेटरी संदीप सूर्यवंशी व सहायक सेक्रेटरी महेश मगरे यांनी परिश्रम घेतले.
युवकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय
समाजातील बरेच युवक बेरोजगार आहेत, तर काहींचा रोजगार कोरोना महामारीने हिरावला आहे. यावर समाजातील तरुणांनी उद्योजकता विकास संकल्पना पंचांपुढे मांडली. उद्योजकता विकास व रोजगारनिर्मितीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासंबंधी पुस्तकांचा संच इत्यादी उपलब्धतेसाठी पंचांकडून युवकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.
समाजात मुलींचे प्रमाण कमी
एकीकडे समाजात मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांचे विवाह झाले नाही. विवाहासाठी मुली मिळणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे कोरोना महामारीमुळे समाजात लग्न होऊन अल्प कालावधीतच महिला विधवा झाल्या आहेत. अशा महिलांचे व त्यांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करून अशा महिलांचे पुनर्विवाह करून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न पंचांतर्फे करण्यात येणार आहे. लवकरच इच्छुक महिलांची यादी बनवून त्यांच्याशी संपर्क करून त्यांचे व नातेवाइकांचे कौन्सिलिंग करून पुनर्विवाहासाठी मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच समाजातील निराधार विधवा महिलांना पंचांच्या वतीने आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे, असे दोन महत्त्वाचे निर्णय या सभेत घेण्यात आले आहे. या निर्णयांचे समाजबांधव व शहरवासीयांकडून कौतुक करण्यात येत आहे.