शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

मताधिक्य टिकविण्यासाठी भाजप तर वर्चस्वासाठी काँग्रेसची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:06 PM

मनोज शेलार ।  नंदुरबार : गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देणा:या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात यंदा मात्र मागील मताधिक्य ...

मनोज शेलार । नंदुरबार : गेल्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य देणा:या नंदुरबार विधानसभा मतदारसंघात यंदा मात्र मागील मताधिक्य टिकविण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागत आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा स्वत:चा मतदारसंघ असल्यामुळे ते या माध्यमातून विधानसभा निवडणुकीची सेमीफाईनल खेळून घेणार आहेत. दरम्यान, आघाडीला मित्र पक्षांना साभाळतांना तर युतीला मित्रपक्षासह पक्षातीलच नाराजांना सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.नंदुरबार विधानसभा मतदारसंघ हा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांचा हक्काचा मतदारसंघ आहे. पाच वेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ.हिना गावीत यांना मिळालेल्या एकुण 1,06,905 एवढे मताधिक्यापैकी निम्मे अर्थात 50 हजार 55 एवढे मताधिक्य एकटय़ा नंदुरबार मतदारसंघातून होते. यंदा मात्र राजकीय समिकरणे बदलली आहेत. भाजपध्ये बंडखोरी झाली आहे. निष्ठावान आणि उपरे असा भेद होत असल्याची सल जुन्या भाजपाईंमध्ये आहे. गेल्या वर्ष, दिड वर्षात घडलेल्या काही घटनांमुळे काही समाज घटकांची उघड नाराजी आहे. मोदी लाट गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बरीच ओसरली आहे. मतदार संघातील काही नाराज मंडळींनी उघड बैठका घेतलेल्या आहेत. मित्र पक्ष शिवसेना देखील अपेक्षेप्रमाणे प्रचारात दिसून येत नाही. मंगळवारच्या बैठकीत बॅनरवरून काढता पाय घेतल्याचे उदाहरण ताजेच आहे. या सर्वाचा परिणाम होणार असल्यामुळे गेल्या निवडणुकीएवढे मताधिक्य टिकविण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 22 रोजी होणा:या सभेचा काय परिणाम होतो याकडे पक्षाचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे काँग्रेसला देखील मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अधूनमधून काँग्रेसच्या पदाधिका:यांसोबत दिसून येतात, परंतु पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्यावरील निष्ठेमुळे त्यांच्या बाजुने कामाला लागले आहेत. भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा मिळविण्यासाठी काँग्रेस प्रय}शील आहे. नगरपालिका, पंचायत समिती तसेच सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था या काँग्रेसच्या ताब्यात आहेत. आमदार रघुवंशी यांचे शिक्षण संस्थेचे जाळे मोठे आहे. त्याचा फायदा काँग्रेस घेण्यासाठी उत्सूक आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी हे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मतदारसंघात येणार असल्यामुळे पक्ष आणि उमेदवाराची आशा वाढली आहे. असे असले तरी पक्षातर्फे एकाही मोठय़ा किंवा दिग्गज नेत्याची सभा घेण्याचे नियोजन नसल्यामुळे त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. एकुणच नंदुरबार मतदारसंघातील स्थिती गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वेगळी आहे. आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांना स्वत:च्या मतदारसंघातील प्रतिष्ठा टिकविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसलाही वाटते तितकी सोपी परिस्थिती नक्कीच नाही. स्थानिक पदाधिका:यांच्या बळावर अवलंबून न राहता उमेदवाराला मतदारांर्पयत पोहचावे लागणार आहे. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कसे आणि किती राजकीय डावपेच टाकले जातात त्यावरच मतदार संघातील एकुण चित्र अवलंबून राहणार आहे.