विद्यार्थी बाधीत प्रकरणी संभ्रम कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:10 IST2020-05-14T10:10:14+5:302020-05-14T10:10:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा येथून बिहारमध्ये गेलेल्या १८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ...

विद्यार्थी बाधीत प्रकरणी संभ्रम कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुवा येथून बिहारमध्ये गेलेल्या १८ विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांची अक्कलकुवा येथे तपासणी होऊन देखील अवघ्या दोनच दिवसात हे विद्यार्थी पॉझिटिव्ह कसे निघतात याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
अक्कलकुवा येथे शिक्षण घेत असलेल्या बिहार मधील अडीच हजार विद्यार्थ्यांना ५ मे रोजी विशेष रेल्वेने सहरसा येथे पाठविण्यात आले होते. पाठविण्यापूर्वी या विद्यार्थ्यांची स्थानिक संस्था आणि प्रशासनातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात एकाही विद्यार्थ्याला कुठलेही लक्षणे आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले. अक्कलकुवा येथून वाहनाने त्यांना नंदुरबार स्थानकापर्यंत आणण्यात आले. रेल्वे स्थानकात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना रेल्वेत बसविण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने विद्यार्थी येण्याआधी, आल्यावर व रेल्वे गेल्यावर रेल्वेसह संपुर्ण परिसर वेळोवेळी सॅनिटाईज केला. विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांना आसन देण्यात आले. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उपस्थितीत रेल्वे रवाना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सहरसा येथे रेल्वे पोहचल्यावर तेथे सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काहींचे स्वॅब घेण्यात आले. त्यात पहिल्या दिवशी तीन, नंतर प्रत्येकी सात व आठ अशा १८ विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.
काही राष्टÑीय न्यूज चॅनेला बातम्या आल्या. त्यात नंदुरबारचे नाव स्पष्टपणे घेण्यात आले. परंतु येथील प्रशासनाने त्याबाबत काहीही स्पष्ट केले नाही. यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली असून तर्कवितर्कही लावले जात आहेत.
या बाबतच्या बातम्या राष्टÑीय न्यूज चॅनेलने देखील दाखविल्या. तेथील जिल्हाधिकाºयांनी याबाबत माहितीही दिली आहे.
संबधीत संस्थेने यापूर्वीच निवेदन देवून विद्यार्थ्यांची योग्य ती आरोग्य तपासणी केली गेल्याचे म्हटले आहे.