शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 हजार, शहादा क्रमांक 2 मधील 1 हजार 263 ग्राहकांकडून 88 लाख 7 हजार, तळोदा येथील 1 हजार 166 कृषिपंपधारकांकडून 68 लाख 64 हजार तर अक्कलकुवा येथील 484 कृषिपंपधारकांकडून 27 लाख 54 हजार तसेच धडगाव येथील 44 कृषिपंपधारकांकडून दोन लाख 60 हजार असे एकूण चार तालुक्यातील 4 हजार 305 कृषिपंपधारकांकडून 3 कोटी रुपयांची वसुली अद्याप करण्यात आलेली आह़े शहादा उपविभागासह इतरही कृषिपंपधारकांकडे कोटय़ावधी रुपयांची वीज बिल थकबाकी आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी असलेल्या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती़ यामुळे संबंधित कृषिपंपधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ ऐन रब्बी हंगामात कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत असल्याने कारवाईसाठी आलेल्या महावितरणचे अधिकारी व संबंधित कृषिपंपधारक यांच्यात वादही होत असत़ कृषिपंपाची ऐवढी थकबाकी भरणे शक्य नसल्याचे संबंधित कृषिपंपधारकांकडून वेळोवेळी महावितरणच्या अधिका:यांना सांगण्यात आल़े परंतु थकबाकी भरली नाही तर, वीज जोडणी खंडीत करण्याची कडक भूमिका महावितरणकडून घेण्यात आली होती़ त्यामुळे यानुसार सुमारे 800 थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीजजोडणी खंडीतही करण्यात आली होती़ परंतु त्यानंतर राज्य शासनाकडून  30 नोव्हेंबर्पयत कुठल्याही थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीजजोडणी खंडीत करण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती़ तथापि त्यानुसार सुमारे 800 कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला होता़ परंतु शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम पूर्ण झाला आह़े त्यामुळे पुन्हा थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या मनात कारवाईची धडकी भरली असल्याचे दिसून येत आह़े सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्यभरातील थकबाकीदार कृषिपंपधारकांबाबत यात निर्णय झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे शहादा उपविभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्याकडून सांगण्यात आले आह़े पावसाअभावी शेतक:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे उत्पन्नातही घट झाली होती़ त्यामुळे याचा विचार करुन शासनाने कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संबंधित कृषिपंपधारकांकडून करण्यात आली आह़े