शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 हजार, शहादा क्रमांक 2 मधील 1 हजार 263 ग्राहकांकडून 88 लाख 7 हजार, तळोदा येथील 1 हजार 166 कृषिपंपधारकांकडून 68 लाख 64 हजार तर अक्कलकुवा येथील 484 कृषिपंपधारकांकडून 27 लाख 54 हजार तसेच धडगाव येथील 44 कृषिपंपधारकांकडून दोन लाख 60 हजार असे एकूण चार तालुक्यातील 4 हजार 305 कृषिपंपधारकांकडून 3 कोटी रुपयांची वसुली अद्याप करण्यात आलेली आह़े शहादा उपविभागासह इतरही कृषिपंपधारकांकडे कोटय़ावधी रुपयांची वीज बिल थकबाकी आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी असलेल्या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती़ यामुळे संबंधित कृषिपंपधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ ऐन रब्बी हंगामात कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत असल्याने कारवाईसाठी आलेल्या महावितरणचे अधिकारी व संबंधित कृषिपंपधारक यांच्यात वादही होत असत़ कृषिपंपाची ऐवढी थकबाकी भरणे शक्य नसल्याचे संबंधित कृषिपंपधारकांकडून वेळोवेळी महावितरणच्या अधिका:यांना सांगण्यात आल़े परंतु थकबाकी भरली नाही तर, वीज जोडणी खंडीत करण्याची कडक भूमिका महावितरणकडून घेण्यात आली होती़ त्यामुळे यानुसार सुमारे 800 थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीजजोडणी खंडीतही करण्यात आली होती़ परंतु त्यानंतर राज्य शासनाकडून  30 नोव्हेंबर्पयत कुठल्याही थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीजजोडणी खंडीत करण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती़ तथापि त्यानुसार सुमारे 800 कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला होता़ परंतु शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम पूर्ण झाला आह़े त्यामुळे पुन्हा थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या मनात कारवाईची धडकी भरली असल्याचे दिसून येत आह़े सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्यभरातील थकबाकीदार कृषिपंपधारकांबाबत यात निर्णय झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे शहादा उपविभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्याकडून सांगण्यात आले आह़े पावसाअभावी शेतक:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे उत्पन्नातही घट झाली होती़ त्यामुळे याचा विचार करुन शासनाने कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संबंधित कृषिपंपधारकांकडून करण्यात आली आह़े