शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महावितरणच्या शहादा उपविभागांतर्गत येणा:या थकबाकीदार कृषिपंपधारकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आह़े शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम उलटून बरेच दिवस झाले आहेत़ परंतु अद्यापर्पयत सुमारे 3 कोटींचीच वसुली झाली असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आह़े शहादा उपविभागातील शहादा क्रमांक 1 मधील 1 हजार 343 थकबाकीदारांकडून 93 लाख 7 हजार, शहादा क्रमांक 2 मधील 1 हजार 263 ग्राहकांकडून 88 लाख 7 हजार, तळोदा येथील 1 हजार 166 कृषिपंपधारकांकडून 68 लाख 64 हजार तर अक्कलकुवा येथील 484 कृषिपंपधारकांकडून 27 लाख 54 हजार तसेच धडगाव येथील 44 कृषिपंपधारकांकडून दोन लाख 60 हजार असे एकूण चार तालुक्यातील 4 हजार 305 कृषिपंपधारकांकडून 3 कोटी रुपयांची वसुली अद्याप करण्यात आलेली आह़े शहादा उपविभागासह इतरही कृषिपंपधारकांकडे कोटय़ावधी रुपयांची वीज बिल थकबाकी आह़े त्यामुळे महावितरणकडून थकबाकी असलेल्या कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली होती़ यामुळे संबंधित कृषिपंपधारकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती़ ऐन रब्बी हंगामात कृषिपंपाची वीज जोडणी खंडीत करण्यात येत असल्याने कारवाईसाठी आलेल्या महावितरणचे अधिकारी व संबंधित कृषिपंपधारक यांच्यात वादही होत असत़ कृषिपंपाची ऐवढी थकबाकी भरणे शक्य नसल्याचे संबंधित कृषिपंपधारकांकडून वेळोवेळी महावितरणच्या अधिका:यांना सांगण्यात आल़े परंतु थकबाकी भरली नाही तर, वीज जोडणी खंडीत करण्याची कडक भूमिका महावितरणकडून घेण्यात आली होती़ त्यामुळे यानुसार सुमारे 800 थकबाकीदार कृषिपंपधारकांची वीजजोडणी खंडीतही करण्यात आली होती़ परंतु त्यानंतर राज्य शासनाकडून  30 नोव्हेंबर्पयत कुठल्याही थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाची वीजजोडणी खंडीत करण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती़ तथापि त्यानुसार सुमारे 800 कृषिपंपधारकांच्या कृषिपंपाचा खंडीत केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडण्यात आला होता़ परंतु शासनाकडून देण्यात आलेला 30 नोव्हेंबरचा अल्टीमेटम पूर्ण झाला आह़े त्यामुळे पुन्हा थकबाकीदार कृषिपंपधारकांच्या मनात कारवाईची धडकी भरली असल्याचे दिसून येत आह़े सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने राज्यभरातील थकबाकीदार कृषिपंपधारकांबाबत यात निर्णय झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचे महावितरणचे शहादा उपविभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांच्याकडून सांगण्यात आले आह़े पावसाअभावी शेतक:यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला त्यामुळे उत्पन्नातही घट झाली होती़ त्यामुळे याचा विचार करुन शासनाने कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे अशी मागणी संबंधित कृषिपंपधारकांकडून करण्यात आली आह़े