शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
पंतप्रधानांच्या आदेशाला भाजप नेत्यांकडून केराची टोपली; दुसऱ्याच दिवशी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलीस ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
5
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
6
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
7
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
8
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
10
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
11
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
13
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
14
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
15
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
16
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
17
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
18
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
19
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
20
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सीमा तपासणी नाक्यावर ‘आओ जाओ घर तुम्हारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 13:04 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर :  महाराष्ट्र राज्याच्या शेजारील गुजरात राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता यामुळे ...

 लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर :  महाराष्ट्र राज्याच्या शेजारील गुजरात राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घोषणा केली आहे. परंतु नवापूर सीमा तपासणी नाक्यावर पहिल्या दिवशी आरोग्य सेवक, पोलीस, महसूल कर्मचारी उशीराने पोहोचले. सकाळी आठ वाजता  उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्यक्षात दुपारनंतर तपासणी सुरू झाली आणि संध्याकाळी पुन्हा बंद यासंदर्भात आरोग्य तपासणी साहित्य उशीराने मिळाल्याने विलंब झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
महाराष्ट्र-गुजरात राज्याच्या सीमेवर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाईल, वाहनांची तपासणी केली जाईल, अशी घोषणा राज्यातील विविध मंत्र्यांनी केली. मात्र त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर होताना दिसून आली नाही. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती या सीमावर्ती भागात     दिसून आली. उशीराने दाखल        होऊन अधिकाऱ्याने फोटोसेशन   करून पुन्हा संध्याकाळी ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली. प्रवाशांकडे कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र असले पाहिजे, असे बंधनकारक केले असता राज्यांच्या सीमेवर काळजीपूर्वक तपासणी करण्यात येत नसल्याने   राज्य सरकारचा आदेश हवेतच    विरला आहे. प्रवाशांची तपासणी      होत नसल्याने कोरोना रुग्ण आले किती? आणि गेले किती? याची माहिती मिळणार नाही, अशी परिस्थिती सीमा भागात दिसून आली. जी परिस्थिती महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती आहे तीच परिस्थिती महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमावर्ती दिसून आली.
शेजारील गुजरात राज्यातील अहमदाबाद ,वडोदरा, सुरत व दिल्लीत कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेतली आहे. परराज्यातून महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या लोकांसाठी राज्य सरकाराने कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. सीमावर्ती भागातील तालुकास्तरावर अंमलबजावणीवर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. परंतु पहिल्या दिवशी नवापूर तपासणी नाक्यावर कोरोनाची तपासणी करणारी यंत्रणा सकाळी दिसून     आली नाही. केवळ एकच मंडळ अधिकारी नागेश चौधरी उपस्थित   होते. आरोग्य, महसूल, पोलीस कर्मचाऱ्यांना सकाळी आठ वाजता हजर राहण्याचे आदेश असताना दुपारपर्यंत तपासणी सुरूच झाली नाही. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी तपासणी साहित्य उशीरा मिळाल्याने विलंब झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात गुजरात राज्यातील उच्छल पोलीस वाहनांची तपासणी करताना दिसून आले. तर नवापूर पोलीस ठाण्यातील केवळ दोन-तीन होमगार्ड ड्युटीवर दिसून आले. पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती दिसून आली नाही. दुपारनंतर तालुक्यातील अधिकारी कामाला लागले.
गुजरात, राजस्थान व अन्य राज्यातून नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या बसेस, कार, खाजगी ट्रॅव्हल्स, ट्रक, टेम्पो रिक्षामधील प्रवाशांची कुठलीही तपासणी सकाळपासून दुपारपर्यंत झाली नाही. आदेश केवळ कागदावरच आहे की काय? असा सवाल उपस्थित केला गेला. यापूर्वी तालुक्यातील तत्कालीन  पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिश्चंद्र कोकणी जातीने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करीत होते. नव्या अधिकाऱ्यांनी पूर्वीच्या अधिकाऱ्यांसारखी कोरोना उपाययोजनांबाबत तत्परता दाखवणे गरजेचे आहे.
शेजारील गुजरात राज्यातून रस्ते महामार्गाने व लोहमार्गाने  नंदुरबार जिल्ह्यात येणाऱ्या लोकांना ९६ तास आधी कोरोनाची चाचणी करणे बंधनकारक आहे. या चाचणीत आरटीपीसीआर नेगेटिव्ह रिपोर्ट आल्यास राज्यात प्रवेश मिळणार आहे. जर कोणी सुरतहून प्रवाशी विमानाने नंदुरबार जिल्ह्यात येत असेल तर ७२ तासापूर्वी त्या व्यक्तीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल निगेटिव्ह येणे बंधनकारक आहे. कोरोना चाचणीच्या रिपोर्टशिवाय येण्या-जाण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. तर दुसरीकडे रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांकडे चाचणी रिपोर्ट नसेल तर त्यांची थर्मल स्क्रिनिंग आणि तापमानाची तपासणी करण्यात येणार आहे.
सरकारच्या आदेशानुसार जर कोणाकडे प्रवासापूर्वी चाचणी   अहवाल नसेल तर त्यांना स्वखर्चाने कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे, अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली आहे.

पहिल्या दिवशी नवापूर तालुक्यातील अनेक सीमा खुल्या
नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा गावानजीक सीमा तपासणी नाक्यावर काही काळ पोलीस बंदोबस्त, आरोग्य तपासणी पथक दिसून आले. परंतु नवापूर तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात भागातील होळीपाडा, चंदापूर, आमलाण, सुंदरपूर, उकळापाणी, करंजवेल, नवागावनजीक आरोग्य तपासणी पथक अथवा पोलीस बंदोबस्त दिसून आला नाही. या भागातील सीमावर्ती भागात सर्रास गुजरात राज्यातील वाहने, प्रवाशी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करीत होते. यावर जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी नवापूर तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

खाजगी बसमधून २० प्रवासी बसून राजस्थान होऊन महाराष्ट्रातील  विदर्भात जात होतो. नवापूर सीमा तपासणी नाक्यावर आमची कोरोनाची कुठलीही तपासणी करण्यात आली नाही. आरटीओ अधिकाऱ्याने बसचे कागदपत्र तपासले.
-नितीनकुमार, 
बसचालक, राजस्थान.