हवामानातील बदलामुळे पिकांच्या काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:02 IST2020-03-21T12:02:02+5:302020-03-21T12:02:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वैंदाणे : वारंवार हवामानात होणारे बदल आणि होणारा अवकाळी पाऊस यामुळे वैंदाणेसह परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या ...

Climate change accelerates the harvest | हवामानातील बदलामुळे पिकांच्या काढणीला वेग

हवामानातील बदलामुळे पिकांच्या काढणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क
वैंदाणे : वारंवार हवामानात होणारे बदल आणि होणारा अवकाळी पाऊस यामुळे वैंदाणेसह परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या काढणीला वेग दिला आहे.
रब्बी हंगामातील जी पिके काढण्यासारखी असतील ते काढण्यावर भर दिला जात आहे. गहू, हरभरा आदी पिकांच्या काढणीसाठी मजूर मिळत नाहीत. कारण प्रत्येक शेतकरी गहू काढण्यासाठी घाई करीत आहे. त्याला पर्याय म्हणून यंत्राच्या सहाय्यानेच पिके काढण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. एकंदरीत शेतकºयांची धावपळ होत असून मिरची, कांदा, वांगी, गहू, हरभरा आदी पिकांची लागवड केलेल्या शेतकºयांच्या नजरा बदलणाºया हवामानाकडे असतात. आपले नुकसान होणार नाही ना? अशी चिंता शेतकºयांना कायम सतावत आहे. दिवसा ऊन व रात्री गारवा अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. बहुतांशी शेतकºयांच्या गहू, हरभरा, टरबूज आदी पिकांचे वातावरणातील बदलामुळे नुकसान झाले आहे.

Web Title: Climate change accelerates the harvest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.