विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:43+5:302021-07-29T04:30:43+5:30
करण चाैफुलीवर पुन्हा वाढले खड्डे नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गावर असलेल्या शहरातील करण चाैफुलीवर पुन्हा खड्डे वाढले आहेत. यामुळे ...

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
करण चाैफुलीवर पुन्हा वाढले खड्डे
नंदुरबार : शेवाळी-नेत्रंग महामार्गावर असलेल्या शहरातील करण चाैफुलीवर पुन्हा खड्डे वाढले आहेत. यामुळे वाहनधारकांचे अपघात घडण्याचे प्रकार सुरू आहेत. खड्ड्यात पावसाचे पाणी साचून असल्याने चारचाकी व दुचाकी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असल्याची चर्चा आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
रोझवा येथे रस्ता दुरुस्तीची मागणी
तळोदा : तालुक्यातील सरदार सरोवरबाधितांची वसाहत असलेल्या रोझवा पुनर्वसन येथे रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली आहे. रस्त्यांवर खड्डे पडून ग्रामस्थांना अडचणीचे ठरत आहे. पाऊस सुरू असल्याने हे खड्डे जलमय होऊन अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गावातील एकही रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत ग्रामंचायत सदस्य भरतसिंग पावरा, बिरसा फायटर्सचे बाखऱ्या पावरा, लालसिंग पावरा, कबीर पावरा, हारसिंग पावरा, कालुसिंग पावरा, चाैधरी पावरा, सुरेश पावरा यांनी तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
शहरात कागदाला आला भाव
नंदुरबार : पाऊस सुुरू झाल्याने ग्रामीण भागात उपाययोजनांनाही गती आली आहे. यात शहरी भागातून साधनांची खरेदी करण्यावर ग्रामीण जनता अधिक भर देत आहे. गेल्या काही वर्षांत धो-धो कोसळणाऱ्या पावसापासून मातीचे छत किंवा गळक्या पत्र्याच्या छतापासून संरक्षण व्हावे यासाठी प्लॅस्टिक कागद वापरण्याला प्राधान्य दिले जाते. दोन दिवसांपासून प्लॅस्टिक विक्रेत्यांकडे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे.