मोकाट श्वानांमुळे नागरीक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:58 IST2021-02-06T04:58:47+5:302021-02-06T04:58:47+5:30
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर् हवेली, वाघोदा आणि पाताेंडा शिवारात मोकाट श्वानांचा प्रश्न कायम आहे. या भागात मोकाट श्वानांचा ...

मोकाट श्वानांमुळे नागरीक त्रस्त
नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर् हवेली, वाघोदा आणि पाताेंडा शिवारात मोकाट श्वानांचा प्रश्न कायम आहे. या भागात मोकाट श्वानांचा त्रास वाढला असल्याने नागरीक त्रस्त आहेत. याबाबत त्यांच्याकडून तक्रारी करुनही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
बांधकाम विभागाची उदासिनता
नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोळदे गावापर्यंत निर्माण झालेले खड्डे बुजवण्याची गरज असताना बांधकाम विभागाने डागडुजी म्हणून रस्त्यात खडी व डांबर टाकून खड्डे बुजवण्याचा प्रयत्न कलेा आहे. यातून नागरीकांचा त्रास वाढला आहे. दुसरीकडे रस्त्यात अर्ध्यावरच खड्डे बुजवण्यात आले असल्याने त्रास वाढला आहे. बांधकाम विभागाच्या या उदासिनेतेचा फटका नागरीकांना बसत आहे.
मार्गदर्शक फलक द्या
नंदुरबार : प्रकाशा ते नंदुरबार दरम्यान कोरीट गावाजवळ रस्ता काम सुरु करण्यात आले आहे. या विस्तारीकरणाच्या ठिकाणी वाहनधारकांच्या सोयीसाठी योग्य ते मार्गदर्शक फलक नसल्याने वाहने काम सुरु असलेल्या ठिकाणी जावून आदळत आहेत. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
स्ट्राॅबेरी आवक सुरु
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागातील डाब व मोलगी परिसरात पिकवली जाणारी स्ट्राॅबेरी बाजारात येवू लागली आहे. यातून उलाढाल वाढीस लागली आहे. दुर्गम भागात पिकवल्या जाणा-या स्टाॅबेरीला मोठी मागणी आहे. ही स्ट्राॅबेरी नंदुरबार जिल्ह्यासह परजिल्ह्यातही रवाना करण्यात येत आहे.
सातपुड्यातील बंधारे ठरताहेत निरुपयोगी
नंदुरबार : सातपुड्याच्या दुर्गम भागात जलयुक्त शिवारांतर्गत तयार करण्यात आलेल्या साठवण बंधा-यांची स्थिती बिकट झाली आहे. हे बंधारे दुरुस्त करण्याची सातत्याने मागणी करुनही कृषी विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कृषी विभागाच्या अखत्यारित तालुक्यातील दुर्गम व अती दुर्गम भागात बंधारे तयार करुन पाणी साठवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
बर्ड फ्ल्यूमुळे चिंता
नंदुरबार : जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. यामुळे नागरीकांमध्ये भिती आहे. प्रशासनाकडून याबाबत जनजागृती करुन चिकन, अंडी हे खाण्यासाठी सुरक्षित आहेत किंवा कसे याची माहिती देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
कापड बाजार तेजीत
नंदुरबार : दिवाळीनंतर लग्नसराईमुळे कापड बाजारात तेजी कायम आहे. यातून दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या उलाढालीतून गेल्या वर्षात झालेले नुकसान भरुन काढण्याचा प्रयत्न व्यापारी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
बँकेबाहेरच्या गर्दीमुळे होतेय वाहतूक कोंडी
नंदुरबार : नंदुरबार शहरातील गजबजलेल्या दिनदयाल अर्थात अंधारे चाैकातील बँकेसमोर होणारी ग्राहकांची गर्दी वाहतूकीस अडचणीची ठरत आहे. ऐन चाैकाला लागून असलेल्या इमारतीच्या बाहेर दुचाकी लावल्यानंतर ग्राहकांनाही बाहेर थांबावे लागते यातून ग्राहकांच्या रांगा थेट रस्त्यावर येत असल्याचे दिसून आले. यात संबधित बँकेत आणखी एका बँकेचे विलीनीकरण झाल्याने खातेदारांची संख्या वाढली आहे. यातून दर दिवशी ग्राहकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसातून चार ते पाच वेळा येथे वाहतूकीची कोंडी होते. याकडे संबधित विभागाने गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी आहे.