सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मार्च अखेरपर्यंत सुरू ठेवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 13:42 IST2020-03-15T13:42:21+5:302020-03-15T13:42:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सीसीआयची कापूस खरेदी यापुढेही सुरू राहावी यासाठी बाजार समितीतर्फे सीसीआयशी बोलणी सुरू आहे. सर्वच ...

सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र मार्च अखेरपर्यंत सुरू ठेवावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सीसीआयची कापूस खरेदी यापुढेही सुरू राहावी यासाठी बाजार समितीतर्फे सीसीआयशी बोलणी सुरू आहे. सर्वच शेतकऱ्यांचा कापूस खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र सुरू ठेवण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नंदुरबार बाजार समितीत सीसीआयची कापूस खरेदी पुन्हा सुरू झाली आहे. परंतु येत्या चार ते पाच दिवसांसाठीच ही खरेदी सुरू राहणार असल्याचे समजते. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा कापूस विक्री होऊ शकणार नाही. आधीच सीसीआयचे केंद्र उशीराने सुरू झाले. त्यातच मध्यंतरी १५ दिवस ते बंद राहिले. आता सुरू झाल्यानंतर पुढील आठवड्यात ते अनिश्चित काळासाठी बंद केले जाणार असल्याचे सीसीआयच्या सूत्रांनी सांगितले. परंतु मार्च अखेरपर्यंत हे केंद्र सुरू ठेवावे अशी अपेक्षा शेतकºयांची आणि बाजार समितीची देखील आहे. त्यामुळे बाजार समितीतर्फे सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाºयांशी बोलणी सुरू आहे. मार्च अखेरपर्यंत केंद्र सुरू ठेवल्यास ज्या शेतकºयांनी कापूस साठवून ठेवला आहे त्या सर्व शेतकºयांचा कापूस विक्री होण्यास मदत होणार आहे. सध्या नंदुरबार केंद्रात जवळपास ९० हजार क्विंटल कापूस खरेदी झाला आहे. शहादा केंद्रात दीड लाख क्विंटलपर्यंत कापूस खरेदी झाली आहे.
दोन्ही ठिकाणचे कापूस खरेदी केंद्र बंद झाल्यास शेतकºयांना मिळेल त्या भावात खाजगी व्यापारी व खेडा खरेदीद्वारे कापूस विक्री करावा लागणार आहे. त्यासाठी खरेदी केंद्र किमान १५ ते २० दिवस सुरू ठेवावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.