सीसीआयने फरदडचीही खरेदी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 12:23 IST2020-05-13T12:23:16+5:302020-05-13T12:23:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत लॉकडाऊन दरम्यान सीसीआयतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. उच्च ...

सीसीआयने फरदडचीही खरेदी करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत लॉकडाऊन दरम्यान सीसीआयतर्फे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. उच्च प्रतीच्या कापसाला प्रती क्विंटल पाच हजार ३५५ रुपये भाव दिला जात असून चार मे पासून आतापर्यंत शहादा येथील केंद्रावर तीन हजार ५०० क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. आजअखेर तालुक्यात किमान ५० हजार क्विंटल उच्च दर्जाचा त्याचप्रमाणे १० हजार क्विंटल फरदड कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक असल्याचा अंदाज वर्तविला जात असून शासनाने फरदड कापसाची खरेदी करावी, अशी मागणी केली जात आहे.
शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सीसीआयच्या केंद्रावर २१ मार्चपर्यंत तालुक्यातील सुमारे एक लाख ७८ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली होती. दरम्यान देशात व राज्यात कोरोना विषाणू संक्रमणाचे संकट आल्याने कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. यामुळे अनेक शेतकºयांकडे कापूस शिल्लक राहिला होता. शासनाने हा कापूस खरेदी त्वरित सुरू करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींसह शेतकºयांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार ४ मे पासून शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीत सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे.
४ ते ११ मे दरम्यान या केंद्रावर सुमारे तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. बाजार समितीकडे आजपर्यंत सुमारे दोन हजार शेतकºयांनी कापसाची नोंद केली असून त्यानुसार तालुक्यात किमान ५० हजार क्विंटल उच्च दर्जाचा कापूस हा शेतकºयांच्या घरात असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. हा संपूर्ण कापूस खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पाटील यांनी दिली. बाजार समितीत नोंद केलेल्या दररोज ५० शेतकºयांना कापूस विक्रीसाठी बोलाविले जाते. सोशल डिस्टन्स पालन करून एकावेळी १० गाड्यांचे मोजमाप केले जाते.
सीसीआयच्या केंद्रावर केवळ उच्च दर्जाच्या कापसाची खरेदी होत असल्याने शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक शेतकºयांकडे शेवटचा कापूस हा फरदड, कवडी या स्वरूपात असून हा अंदाजे तालुक्यात १० हजार क्विंटलपेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या शेवटच्या कापसाची खरेदी शासनाने करावी. केवळ एकाच ग्रेडचा कापूस खरेदी न करता शेवटच्या कापसाला योग्य तो भाव देऊन शासनाने खरेदी करायलाच पाहिजे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. खुल्या बाजारात उच्च प्रतीच्या कापसासह शेवटच्या कापसाला अत्यंत कमी भाव दिला जात असल्याने शेतकºयांचा ओढा कापूस विक्रीसाठी सीसीआयकडे वाढला आहे.
कोरोना विषाणू संकटानंतर खुल्या बाजारात कापूस खरेदी मध्य प्रदेशातील खेतिया बाजार समितीत सुरू झाली असली तरी व्यापाºयांकडून भाव अत्यंत कमी असल्याने शेतकºयांना त्याची विक्री करणे परवडत नाही. सीसीआयतर्फे केवळ उच्च दर्जाच्या कापसाची खरेदी होत असल्याने शेवटच्या कापसाचे करावे काय? या विवंचनेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार सीसीआय केंद्रावर केवळ उच्च दर्जाच्या कापसाची (एफएक्यू) खरेदी केली जात आहे. शासनाने केवळ या ग्रेडच्या कापसाची खरेदीची परवानगी दिली असल्याने शेतकºयांनी असाच कापूस केंद्रावर विक्रीसाठी आणावा. तालुक्यातील सर्वच शेतकºयांचा कापूस खरेदी करण्यासाठी केंद्रावर नियोजन करण्यात आले आहे.
-सुनील पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.
शेतकºयांकडे शिल्लक राहिलेल्या कापसाची नोंदणी बाजार समितीमार्फत करण्यात आलेली असून त्यानुसार आदल्या दिवशी प्रत्येक शेतकºयाला दूरध्वनीद्वारे सूचना केली जाते की, त्यांनी केंद्रावर आपला कापूस विक्रीसाठी आणावा. अद्यापपर्यंत ज्या शेतकºयांनी नोंदणी केली नाही अशांनी त्यांच्याकडे असलेल्या कापसाची नोंदणी करावी. केवळ उच्च दर्जाच्या कापसाची खरेदी करण्याचे शासनाचे आदेश असल्याने अनेक अडचणी येत आहेत. ग्रेडर व शेतकºयांचे वाद होत असून केंद्र चालवायला अडचणीत येत आहेत.
-संजय चौधरी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, शहादा.