शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
2
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
3
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
4
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
5
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
6
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
7
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
8
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
9
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
10
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
11
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
12
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
13
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
14
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
15
सलग ६ दिवसांच्या तेजीला ब्रेक! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान, एशियन पेंट्समध्ये सर्वाधिक आपटला
16
इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात; कोण पसरवतोय गैरसमज? नितीन गडकरीनी स्पष्टच बोलले
17
Shani Amavasya 2025: शनीची वक्री चाल 'या' ५ राशींचे पुढील २ महिने करणार हाल; जाणून घ्या उपाय!
18
आता आरोग्य विमा तुमच्या आवाक्यात राहणार! कंपन्यांच्या प्रीमियम वाढीवर IRDAI घेणार मोठा निर्णय
19
विश्वासातील 'टाटां'च्या शेअर्सनं केलं निराश, ग्रुपच्या या शेअरनं सर्वाधिक बुडवलं
20
'कर्मचारी निलंबित होऊ शकतो, तर पंतप्रधान का नाही?', PM-CM विधेयकावरुन मोदींचा काँग्रेसवर निशाणा

विधानसभा निवडणुकीतील उमेदवार जि.प.च्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीत अनेक दिग्गज नेते रिंगणात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवापूर मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी केलेले तथा माजी जि.प.अध्यक्ष भरत माणिकराव गावीत, अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केलेले भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, माजी जि.प.अध्यक्षा कुमुदिनी गावीत, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व शिवसेना नेते अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्यासह इतरांचा समावेश आहे.जिल्हा परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्टे म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात अनेक दिग्गज उभे आहेत.दोघांचा समावेशविधानसभा निवडणूक लढविणाऱ्या दोन उमेदवारांनी आता पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीत नशीब अजमविण्याचे ठरविले आहे. नवापूर मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी केलेले तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत माणिकराव गावीत यांनी रायंगण गटातून भाजपतर्फे उमेदवारी केली आहे. याशिवाय अक्कलकुवा विधानसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेले व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी गंगापूर गटातून भाजपतर्फेच उमेदवारी केली आहे.माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी कुमुदिनी गावीत या कोठलीखुर्द गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अ‍ॅड.राम रघुवंशी यांनी कोपर्ली गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी जि.प.उपाध्यक्ष, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील पाटील या लोणखेडा गटातून उमेदवारी करीत आहेत. माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी सेवानिवृत्त बीडीओ आशा नरेंद्र पाडवी यांनी भगदरी, ता.अक्कलकुवा गटातून शिवसेनेच्या उमेदवार म्हणून उभ्या आहेत. शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र माजी जि.प.सदस्य अभिजीत पाटील हे म्हसावद व पाडळदा गटातून काँग्रेसतर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.जिल्हा परिषद निवणुकीत यंदा भाजपने सर्वच गटात उमेदवार दिले आहेत. त्या खालोखाल काँग्रेसने नंतर शिवसेनेने उमेदवार दिले असून राष्ट्रवादीनेही काही गटात उमेदवार उभे केले आहेत.दिग्गजांच्या उमेदवारीमुळे संबधीत गटांकडे लक्ष लागून आहे. त्या त्या मतदारसंघात संबधीतांनी आपली ताकद लावली आहे. विरोधी पक्षाने देखील त्यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्याचा प्रयत्न केल्याने निवडणूक चुरशीची झाली आहे.