शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

देशात व राज्यातही बळीचे राज्य आणा- छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टाळण्यासाठी व बळीराजाचे राज्य देशात व राज्यात येण्यासाठी सर्वानी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टाळण्यासाठी व बळीराजाचे राज्य देशात व राज्यात येण्यासाठी सर्वानी एकजूट व्हा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी शहादा येथे रविवारी समता मेळाव्यात बोलताना केले. हे सरकार मनुवाद्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन काम करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.समता परिषदेतर्फे रविवारी दुपारी बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत समता मेळावा झाला. या वेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष आमदार चंद्रकांत रघुवंशी,  सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, राष्ट्रवादीचे धुळे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, सतीश महाले, बाजार समितीचे सभापती सुनील पाटील, ईश्वर पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, पं.स. सभापती दरबारसिंग पवार, जि.प. सभापती आत्माराम बागले, समता परिषदेचे राजेंद्र माळी, विनोद अहिरे, ईश्वर वारुळे, जगदीश माळी, रमाशंकर माळी  आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  मनुग्रंथाने पाच हजार वर्षे लोकांना माणुसकीच्या हक्कापासून दूर ठेवले. महिलांना कोणत्याही प्रकारची स्वतंत्रता दिली नव्हती असे सांगून छगन भुजबळ पुढे म्हणाले की, बहुजनांनी कष्टाने मिळविलेली संपत्ती जमा करण्याचा अधिकारही मनुस्मृतीने त्यांना दिला नव्हता. डॉ.आंबेडकरांनी सर्वाना समान अधिकार दिला. बाबासाहेबांनी बहुजन समाजाला सर्व अधिकार मिळवून दिला. मनुवाद पुन्हा पुढे आणला जात आहे असे सांगून संभाजी भिडे मनुवाद जोपासत असल्याचा आरोप केला. संतांपेक्षा मनु मोठा असल्याचे भिडे सांगतात, हे थांबवले पाहिजे. लढण्याची शक्ती हृदयापासून लागते. हिंमत असेल तर लढायला वय आडवे येत नाही. मोदी सरकारवर टीका करताना भुजबळ म्हणाले की, हे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी असे आहे. काळा पैसा काढण्यासाठी केलेली नोटबंदीमुळे एक रुपयाही सरकारी तिजोरीत जमा झाला नाही. आतंकवाद अजूनही थांबलेला नाही. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे एक कोटी लोकांचे धंदे बंद झाल्याचे सांगितले. बेरोजगारीच वाढली असून या सरकारने सहकार चळवळही मोडीत काढली आहे. शेतकरी, व्यापारी सारेच अडचणीत आले आहेत. हे सरकार खाली खेचण्यासाठी पक्षभेद न ठेवता सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले.राजेंद्रकुमार गावीत म्हणाले की, भुजबळ यांनी देशात मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली. त्यांनी अनेक छोटय़ा कार्यकत्र्याना बळ दिले. दीपक पाटील म्हणाले की, देशात जातीयवाद फोफावत आहे. सर्वाना सोबत घेऊन चालण्याची शिकवण स्व पी.के. अण्णांनी दिली आहे. परिसरात समता टिकवण्याचा प्रय} आम्ही करतो. आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, समता परिषद एखाद्या समाजापुरती मर्यादित नाही. मी जातीपातीचे राजकारण करीत नाही. सर्र्वानी सोबत राहून परस्परांना सहकार्य केले पाहिजे. युतीचे राज्य भुजबळांनी घालविले. त्यांनी अनेक आमदारांना घडविले. देशात द्वेषाचे राजकारण सुरु असल्याचे सांगून जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वी आरक्षणाचा मुद्दा सोडवावा लागेल, असे स्पष्ट केले. कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आर.पी.आय.चे पदाधिकारी, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी जि.प. सदस्य अभिजित पाटील, प्राचार्य मकरंद पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन राजाराम पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर मोरे, विजय विठ्ठल पाटील,  सुपडू खेडकर, अरविंद कुवर, घनश्याम निझरे, जयप्रकाश पाटील, अरविंद पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, रवींद्र राऊळ,  समता परिषदेचे हरीश सैंदाणे, सी.डी. बोडरे, यादव माळी, ईश्वर माळी, हिरालाल माळी, प्रवीण वाघ, मनोज वारुळे, संतोष माळी, पारस माळी, विठोबा माळी, आनंदा माळी, अनिल माळी, सुनील खलाणे, सतीलाल निजरे यांच्यासह समता परिषदेच्या कार्यकत्र्यानी मेळावा यशस्वी होण्यासाठी प्रय} केले. प्रास्तविक राजेंद्र वाघ यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी तर आभार ईश्वर पाटील यांनी मानले. या वेळी छगन भुजबळ यांनी मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. समता परिषदेतर्फे भुजबळांना सन्मानपत्र देण्यात आले. समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र वाघ यांच्या नियुक्तीची घोषणा करुन भुजबळ यांनी वाघ यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. कार्यक्रम तब्बल दोन तास उशिरा सुरू झाल्याने लोकांमध्ये चलबिचल सुरु झाली. मात्र छगन भुजबळ यांनी भाषणात शेरोशायरी करून टाळ्या मिळवल्या.  भुजबळांना निवेदन देण्यासाठी मोठी गर्दी झाल्याने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कार्यकर्ते आणि पोलिसांना कसरत करावी लागली.