शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
4
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
5
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
6
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
7
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
8
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
9
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
10
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
11
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
12
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
13
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
14
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
15
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
16
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
17
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
18
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
19
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
20
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका

२२ खेड्यांना जोडणाऱ्या पुलाची झाली वाताहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात वर्षातच कोठवा नाल्यावरील पूल वाहून गेला. या पुलाची पुनर्बांधणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या सात वर्षातच कोठवा नाल्यावरील पूल वाहून गेला. या पुलाची पुनर्बांधणी करण्यात आली नसल्यामुळे महाराष्टÑ व गुजरातमधील २२ खेड्यांचा संपर्क तुटला आहे.तळोदा तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावांसह गुजरातमधील काही गावांच्या सोयीसाठी कोठवा नाल्यावर गुजरात शासनाकडून पुल बांधण्यात आला. पुलाचे ठिकाण व रस्ता गुजरातमध्ये येत असल्याने पुल गुजरातच्या बांधकाम विभागामार्फत १० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. हा पूल सर्वाधिक गावांना सोयीचा ठरत होता. परंतु पुल बांधल्यानंतर केवळ सात वर्षातच वाहून गेला. कदाचित या पुलाचे बांधकामात दर्जा राखला गेला नसावा, असे म्हटले जात आहे.हा पुल तुटल्यामुळे तळोदा तालुक्यातील जुवाणी, धजापाणी, मालदा, तुळाजा, करडे, बन, न्युबन, लाखापूर या गावांमधील नागरिकांची गैरसोय होत आहे. या नारिकांना १५ किलो मिटरचा अतिरिक्त फेरा मारावा लागत असून त्यातून त्यांना आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागत आहे. हा भूर्दंड टाळण्यासाठी पुलाची पुनर्बांणी होणष अत्यावश्यक आहे. त्यामुळे बांधकामासाठी दोन्ही राज्यातील नागरिकांमार्फत दोन्ही राज्याच्या प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतु नागरिकांच्या मागणीची कुठल्याच शासनाकडून दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे तीन वर्षांपासून नागरिकांची गैरसोय सुरूच आहे. दोन्ही राज्यांकडून योग्य तोडगा काढत नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी होत आहे.४गुजरात शासनामार्फत १० वर्षापूर्वी या पुलाचे बांधकाम करण्यात आले. पुलाचे ठिकाण हे गुजरात हद्दीत येत असल्यामुळे हे काम गूजरातकडून करण्यात आले. परंतु पुल वाहून गेल्यानंतर हा पुल महाराष्टÑातील नागरिकांना सर्वाधिक सोयीचा ठरत आहे. त्यामुळे गुजरात शासनाने याच्या पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले जात आहे. एका बाजुने हा२२ पूल गुजरातच्या हद्दीत येत असल्याचे म्हणत महाराष्टÑ शासनाकडूनही या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या पुलाचा नेमका तोडगा निघत नाही. परिणामी दोन्ही राज्यातील नागरिकांची गैरसोय होत आहे. तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्याची सुंयुक्त बैठक घेण्यात यावी, अशा बैठकीतून योग्य मार्ग निघेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.