जयनगर येथे २६ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:37+5:302021-07-07T04:37:37+5:30
सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये व शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन ...

जयनगर येथे २६ दात्यांचे रक्तदान
सामाजिक कर्तव्य म्हणून २ जुलैपासून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभियानांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात विविध गावांमध्ये व शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त ‘लोकमत’ व विविध शहर ग्राम गुजर ग्लोबल मित्र मंडळ (व्हीएसजीजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने जयनगर येथे मंगळवारी शिबीर झाले. युनिक फाउंडेशनचे जितेंद्र पाटील, सरपंच मिनाबाई सोनवणे, उपसरपंच सुनील माळी, विश्वनाथ पाटील यांनी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर खाज्या नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. जितेंद्र पाटील व विश्वनाथ पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या शिबिरात जयनगर व कोंढावळ गावातील २६ दात्यांनी रक्तदान केले. तसेच पाच जणांनी नोंदणी केली आहे. जे नोंदणी केलेले तरुण आहेत त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस घेऊन चार ते पाच दिवस झाले आहेत, ते पुढे होणाऱ्या शिबिरात रक्तदान करणार आहेत. शिबिराला युनिक फाउंडेशनचे सहकार्य लाभले. शिबिरास माजी सरपंच अर्जुन सोनवणे, माजी उपसरपंच संदीप माळी, अंकुश सोनवणे, हर्षल पाटील, दशरथ पाटील, अतुल माळी, गोपाल माळी उपस्थित होते. शिबिरासाठी ‘लोकमत’चे जयनगर प्रतिनिधी किशोर रामदास माळी व कोंढावळचे प्रतिनिधी जगदीश अहिरे, दादा करंजे, मोहन माळी यांनी परिश्रम घेतले.