एप्रिल ते जुलै दरम्यान जिल्ह्यातील ५४३ नागरिकांना केला सापाने दंश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 12:33 IST2020-08-20T12:33:01+5:302020-08-20T12:33:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या काळात ५४३ जणांना सर्पदंश झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने ...

एप्रिल ते जुलै दरम्यान जिल्ह्यातील ५४३ नागरिकांना केला सापाने दंश
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या काळात ५४३ जणांना सर्पदंश झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली असून यंदा पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दीड हजार लसींचा पुरवठा करण्यात आला आहे़ यात धडगाव आणि अक्कलकुवा हे दोन तालुक्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आली आहे़
पावसाळ्यात दुर्गम भागासह सपाटीच्या गावांमध्ये सर्पदंश होवून मृत्यू होण्याच्या घटना घडतात़ या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने यंदा जुलै महिन्यापूर्वीच सर्व ६० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९० पेक्षा अधिक उपकेंद्रांमध्ये लसींचा पुरवठा केला आहे़ यात प्रामुख्याने दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांना प्राधान्य देण्यात आले असून यंदा सर्पदंशाने मृत्यू झालेल्यांची नोंद नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यात पावसाळ्यात किमान ५०० पेक्षा अधिक जणांना सर्पदंश होतो़ यात मृत्यूच्या घटनाही घडल्या असल्याने आरोग्य विभागाने धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील सुमारे २६ आरोग्य केंद्र आणि दोन्ही बोट अँम्ब्युलन्स याठिकाणी लसींचा पुरवठा केला आहे़
तूर्तास सर्व आरोग्य केंद्रांमध्ये १ हजार लसी ह्या शिल्लक आहेत़ तर दीड हजार लस जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यात आहेत़ वेळोवेळी लसीचा पुरवठा होणार आहे़ सर्पदंश झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर झाल्यास त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेष किटचाही पुरवठा करण्यात आला आहे़
जिल्ह्यात एप्रिल ते जुलै या तीन महिन्याच्या काळात झालेल्या ५४३ सर्पदंश केसेसपैकी १३७ धडगाव तर १२३ ह्या अक्कलकुवा तालुक्यात घडल्या आहेत़ दुर्गम भागाचा समावेश असलेल्या या दोन तालुक्यात नवीन लसींचा तातडीने पुरवठा करण्यात आला आहे़
दर महिन्यात सर्पदंश केसेस आणि लसीकरणाचा आढावा घेत पुरवठा करण्यावर आरोग्य विभाग भर देत असल्याची माहिती देण्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एऩ डी़ बोडक यांच्याकडून देण्यात आली आहे़