जिल्ह्याची केळी सातासमुद्रापार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 12:37 IST2020-01-01T12:37:51+5:302020-01-01T12:37:58+5:30
हिरालाल रोकडे । लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : केंद्र व राज्य राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता केवळ आपल्या ...

जिल्ह्याची केळी सातासमुद्रापार...
हिरालाल रोकडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : केंद्र व राज्य राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता केवळ आपल्या हिमतीवर व मेहनतीच्या जोरावर ब्राह्मणपुरी ता.शहादा येथील शेतकऱ्यांनी पिकवलेली केळी आखाती देशात निर्यात करून आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली निर्यात व्यापक चळवळ ठरली असून यातून शेतकऱ्यांना हमखास व भरघोस उत्पन्न मिळत आहे.
केळी हे तसे नाशवंत पीक. केळीला शासनाने हमीभाव जाहीर केलेला नाही. परिणामी वर्षभर मेहनत करूनही परप्रांतीय व्यापारी देतील तोच भाव स्वीकारायचा व दरवर्षी पारंपरिक पद्धतीने केळीचे उत्पादन घ्यायचे. यातून बºयाचदा परप्रांतीय व्यापाºयांनी परिसरातील शेतकºयांची केलेली आर्थिक फसवणूक यामुळे केळीची शेती करायची किंवा नाही अशा विवंचनेत स्थानिक शेतकरी असताना परिसरातील प्रगतीशील शेतकरी स्व.नरोत्तम मंगेश पाटील यांनी २०१६ केळी निर्यातीचा विचार केला. यासाठी त्यांनी गुजरात राज्यातील एका खाजगी कंपनीशी संपर्क साधून परदेशात निर्यातीसाठी योग्य असलेली केळी आपल्या भागात कशा पद्धतीने उत्पादित केली जाईल याबाबत माहिती व मार्गदर्शन घेऊन केळीची लागवड केली. त्यातून त्यांनी सर्वप्रथम आखाती देशात केळीची निर्यात केली. स्थानिक बाजारभावापेक्षा अधिक उत्पन्न मिळाल्याने त्यांनी सुरू केलेल्या या प्रयोगाला पुढच्यावर्षी परिसरातील अनेक शेतकºयांनी सहमती देत निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या केळीचे उत्पादन घ्यावयास सुरुवात केली. स्व.नरोत्तम पाटील यांनी केळी निर्यातीच्या लावलेल्या या रोपट्याचे परिसरातील शेतकºयांनी वटवृक्षात रूपांतर केले आहे.
कोल्हापूर येथील धरती अॅग्रो व गुजरात राज्यातील देसाई अॅग्रो व एनआयए अॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून निर्यातीसाठी योग्य असणाºया केळीची लागवड व उत्पादन घेतले जात आहे. परदेशात निर्यातीसाठी आवश्यक ते सर्व सोपस्कार या खाजगी कंपन्या करतात. केळीचे पीक तयार झाले की याच कंपन्या शेतकºयांच्या बांधापर्यंत येऊन शेतातून केळीची कापणी करून त्याची आवश्यक ती रासायनिक प्रक्रिया पार पडल्यानंतर सहा व १३ किलो वजनाचे बॉक्स पॅकिंग केले जाते. त्यानंतर ही प्रक्रिया केलेली केली मुंबईपर्यंत नेल्यानंतर तेथून परदेशात निर्यात केले जाते.
ब्राह्मणपुरी येथील संजय उत्तम पाटील, विठ्ठल मंगेश पाटील, रोहिदास मंगेश पाटील, गोपाळ मंगेश पाटील, जगन्नाथ नारायण पाटील, अनिल पाटील, अंशुमन पाटील आदी शेतकºयांनी गेल्या तीन वर्षात सर्वाधिक केळी आखाती देशात निर्यात करून शेतकºयांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे केळीच्या निर्यातीसाठी केंद्र व राज्य शासनाची कुठलीही मदत अथवा मार्गदर्शन या शेतकºयांना लाभलेले नाही. केवळ स्वत:च्या हिमतीवर व मेहनतीवर या शेतकºयांनी खाजगी कंपनीच्या सहकार्याने केळीची निर्यात यशस्वीपणे पार पाडली आहे.