दर्जान्नोतीसाठी आश्रमशाळांची स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:40 IST2020-02-05T21:40:29+5:302020-02-05T21:40:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : स्वच्छतेबाबत खालावेल्या दर्जामुळे चर्चेत असलेल्या ११ आश्रमशाळांचा कायपालट करण्याची किमया नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास ...

दर्जान्नोतीसाठी आश्रमशाळांची स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : स्वच्छतेबाबत खालावेल्या दर्जामुळे चर्चेत असलेल्या ११ आश्रमशाळांचा कायपालट करण्याची किमया नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने अवघ्या १५ दिवसात करुन दाखवली आहे़ प्रकल्प कार्यालयाने स्वच्छतेसाठी घेतलेल्या या स्पर्धेत तीन शाळांना पुरस्कृत करुन प्रोत्साहन देण्यात येणार आहे़
आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील अस्वच्छता, बेशिस्ती, खालावलेली शैक्षणिक गुणवत्ता याबाबत सातत्याने ओरड होत आहे़ प्रकल्प कार्यालयांनी सातत्याने कारवाई करुनही कामकाज सुरळीत होत नसल्याचे चित्र आहे़ यावर मार्ग म्हणून नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्पाधिकारी वसुमना पंत यांनी गेल्या महिन्यात ‘दर्जान्नोती’साठी ११ आश्रमशाळांची निवड करुन त्यांच्यात स्पर्धा होणार असल्याचे कळवले होते़ प्रथम तीन शाळांना रोख बक्षिसे आणि पारितोषिक देण्याची घोषणा त्यांनी केली होती़ त्यांच्या या उपक्रमाला प्रतिसाद देत १५ जानेवारीपासून सुरु झालेल्या स्पर्धेत सर्व ११ आश्रमशाळांनी हिरीरीने सहभाग घेत आश्रमशाळांचा कायापालट केल्याचे चित्र दिसून येत आहे़ विद्यार्थी, शिक्षक आणि आश्रमीय कर्मचारी यांच्या सहकार्याने रंगलेल्या या स्पर्धेमुळे नंदुरबार प्रकल्पातील सर्वाधिक वाईट या यादीतील आश्रमशाळा थेट सर्वाधिक चांगल्या यादीत आल्या आहेत़ विशेष म्हणजे या उपक्रमासाठी खूप सारा शासकीय निधी खर्च न करता प्रथमच आश्रमशाळा प्रशासनाने श्रमदान करुन कामकाज केल्याने त्यांची गाडी रुळावर येण्यास सुरुवात झाली आहे़
आश्रमशाळांनी १५ दिवसात राबवलेल्या विविध कामांची माहिती घेण्यासाठी ९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन पडताळणी करण्यात आली होती़ अधिकाऱ्यांनी त्या-त्या आश्रमशाळांना भेटी देत गुणदान करुन अहवाल प्रकल्पाधिकारी यांना सोपवला आहे़ येत्या १५ फेब्रुवारीनंतर या स्पर्धेचा निकाल घोषित होण्याची शक्यता असून मुख्याध्यापक व शाळा प्रशासनानांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आहे़
नंदुरबार प्रकल्पांतर्गत शहादा तालुक्यातील चिरखान, चांदसैली, मलगाव, नवलपूर, राणीपूर आणि गणोर येथील शासकीय आश्रमशाळा, नवापुर तालुक्यातील निजामपूर, बंधारे, खेकडा, वडकळंबी तर नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे, भालेर येथील शासकीय आश्रमशाळांमध्ये हा प्रकल्प राबण्यात आला आहे़ स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ११ आश्रमशाळांसाठी १०० गुणांचे निकष लावण्यात आले होते़ त्यानुसार शाळांनी पूर्ण केलेल्या उपक्रमांची पाहणी सहायक प्रकल्पाधिकारी व शिक्षण विस्तार अधिकाºयांनी केली़ नंदुरबार तालुक्यात सहायक प्रकल्प अधिकारी पी़बी देसाई, जिजाबाई पाडवी, नवापुर तालुक्यात शिक्षण विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी नंदकुमार साबळे, यु़एल़बेडसे तर शहादा तालुक्यात सहायक प्रकल्पाधिकारी एस़एनक़ाकडे यांनी भेटी दिल्या होत्या़ सर्व ११ आश्रमशाळांनी राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करुन त्या निकषानुसार गुणदान देत अहवाल प्रकल्पाधिकाºयांना दिला आहे़
उपक्रमांतर्गत विद्यार्थी सहभागासाठी १० गुण देण्यात आले होते़ यात गणवेश, शिस्तपालन, वर्गसजावट, वसतीगृह, शाळा, वर्गखोल्या स्वच्छता, विद्यार्थी रॅली, आरोग्य, जनजागृती, शैक्षणिक गुणवत्ता आदी १० निकषांचा समावेश होता़
४कर्मचारी सहभाग यांतर्गत १० गुण देण्यात आले़ शाळेचे नियोजन, वेळ, कामकाज, विद्यार्थ्यांची तपासणी, पालकांसोबत संवाद, ज्यादा तासिकांचे नियोजन, विद्यार्थी गुणवत्तासाठी प्रयत्न आदी मुद्दे होते़
शालेय इमारत व परिसरासाठी गुणदान करण्यात आले होते़ यात विद्युत कनेक्शन, सुरक्षिता, पुरेशा खोल्या, स्वच्छता, मांडणी, वृक्षसंवर्धन, क्रीडांगण आदी मुद्द्यांना गुण देण्यात आले़
स्पर्धेंतर्गत सोयी सुविधा व टापटीप याचेही परीक्षण करण्यात आले़ यात मुख्याध्यापक कक्ष, शिक्षकांचे दालन, पिण्याचे शुद्ध पाणी, वाचन कट्टा, स्वच्छ परिसर, पारंपरिक नियोजन, भोजन व्यवस्था, पुरेसे आणि चवदार भोजन यांचे परीक्षण करण्यात आले़
विद्यार्थ्यांच्या सहभागाने उपयोगी परसबागेची निर्मिती विद्यार्थ्यांनी केली होती़ त्याची माहिती अधिकाºयांनी घेतली़
पाण्याची सोय, मुबलकता, स्वच्छतागृह, स्रानगृह आणि स्वच्छता यांचाही आढावा घेण्यात आला़
वसतीगृह व्यवस्थापन, स्वच्छता टापटीप याचीही पाहणी पथकांनी केली़
या उपक्रमांतर्गत शालेय अभिलेखे, दस्तावेज, मांडणी यांची पाहणी करण्यात आली़ बहुतांश आश्रमशाळांमध्ये कपाट, खुर्च्या, टेबल यांची सोय असली तरीही त्यांची निगा घेतली जात नसल्याचे यापूर्वी निदर्शनास आले होते़ यामाध्यमातून त्यांची दुरुस्ती आणि स्वच्छता झाली़
तसेच विद्यार्थ्यांची कागदपत्रे, दाखले, गुणपत्रके, मासिक सभा, इतिवृत्त यांचीही माहिती आश्रमशाळांनी नेटकी करुन सादर केल्याने पुढील अडचणी दूर झाल्या आहेत़