दुर्गम भागात हिंस्र प्राण्यांमुळे चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:31+5:302021-05-08T04:31:31+5:30
धडगाव : तालुक्यातील गाव पाड्यांवर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली ...

दुर्गम भागात हिंस्र प्राण्यांमुळे चिंता
धडगाव : तालुक्यातील गाव पाड्यांवर हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात पाळीव जनावरे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. जंगलातील झरे आटल्याने जनावरे गाव-पाड्यांच्या जवळ येत आहेत. यातून पाळीव पशुंवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असल्याचे आदिवासी बांधवांकडून सांगण्यात येत आहे.
उपसा सिंचन योजनेला गती द्यावी
लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. यंदाच्या वर्षात ही योजना व्हावी, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने कामाला गती देण्याची सूचना करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. योजनेचे काम काहीअंशीच शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पोलीस गस्तीची गरज
नंदुरबार : शहरातील होळ तर्फ हवेली शिवारातील विविध वसाहतींमध्ये पोलीस गस्त वाढवण्याची रहिवाशांची मागणी आहे. या भागात भुरटे चोर रात्री भटकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या असल्याने नागरिक चिंतेत आहेत.
बॅटऱ्या खराब
धडगाव : दुर्गम भागात दूरसंचार विभागाने लावलेल्या टाॅवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या असल्याने वेळावेळी टाॅवर बंद होऊन सेवा ठप्प होत आहे. याबाबत नागरिकांनी दूरसंचार विभागाला माहिती देऊनही योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. दुर्गम भागात दररोज सेवेचा बोजवारा उडत आहे.