लाभाच्या योजनांचे अनुदान मिळत नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:18 IST2019-07-23T12:18:09+5:302019-07-23T12:18:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : श्रावणबाळ, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, अपंग  निवृत्ती वेतन आदी ...

Angry about not getting the benefit plan subsidized | लाभाच्या योजनांचे अनुदान मिळत नसल्याने नाराजी

लाभाच्या योजनांचे अनुदान मिळत नसल्याने नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : श्रावणबाळ, वृध्दापकाळ, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन, अपंग  निवृत्ती वेतन आदी योजनांच्या माध्यमातून गरीब शेतमजुरांना मिळणारे अनुदान गेल्या सहा महिन्यांपासून न मिळाल्यामुळे महाराष्ट्र राज्य शेतमजुरांच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. 
या वेळी तहसीलदार मनोज खैरनार यांनी येत्या आठ दिवसात लाभाथ्र्याच्या खात्यावर अनुदान वितरीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
शेतमजुरांना देण्यात येणा:या अनुदानात केंद्र शासनाच्यावतीने दरमहा 600 रुपयांर्पयत वाढ  करण्यात आली. राज्य व केंद्रातर्फे मिळून सुमारे एक हजार रुपये इतका लाभ देण्यात येणार असून, जुलै महिन्यापासून याची अमंलबजावणी होणार असल्याबाबतचा शासन निर्णयदेखील जाहीर झाला आहे. 
वृध्द, विधवा, अपंग आदींच्या लाभासाठी मिळणारे निवृत्तीवेतन तहसील कार्यालयातून ऑनलाईन पाठविले जाते. मध्यंतरी लोकसभेच्या निवडणुकांमुळे अनुदान पाठविण्यास विलंब झाला असून, सुमारे सहा महिन्यांर्पयत अनुदान मिळाले नसल्याने या अनुदानावर अवलंबून असणारे बहुतांशी वृध्द वेळोवेळी बँकेत तसेच शहरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असणा:या तहसील कार्यालयाचे उंबरठे  ङिाजवित आहेत. मात्र तरीही  अनुदान मिळत नसल्याने त्यांना निराशेने परतावे लागत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्यावतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार मनोज खैरनार यांना निवेदन दिले.  याप्रसंगी रामदास मोरे, कमुबाई  ठाकरे, ब्रिजलाल मोरे, कांतीबाई ठाकरे, मनुबाई नाईक, साखराबाई कोळी, सखुबाई कोळी, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.
 

Web Title: Angry about not getting the benefit plan subsidized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.