शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागाचा शेतीशाळा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:07 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यास सेंद्रीय शेतीची जोड देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने यंदापासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतक:यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यास सेंद्रीय शेतीची जोड देण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाने यंदापासून शेतीशाळा हा उपक्रम हाती घेतला असून, तळोदा तालुक्यात 21 गावांना या शाळांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच गणेश बुधावल येथील शेतक:यांना या कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतक:यांच्या उत्पादनावर होणारा प्रचंड खर्च कमी करून त्यांना अधिक उत्पादनाबरोबरच सेंद्रीय शेतीची जोड व्हावी यासाठी संपूर्ण राज्यात यंदा शेतीशाळा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यक्रमातून प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून शेतक:यांना पीक व कीड व्यवस्थापनाचे धडे देण्यात येणार आहे. तळोदा तालुक्यातील कोठार, गणेश बुधावल, सोमावल नर्मदानगर, ङिारी, सरदारनगर, खुषगव्हाण, सेलवाई, रांझणी, रेवानगर, गोपाळपूर पुनर्वसन,  रापापूर, बोरद, लाखापूर (फॉ), धनपूर, धानोरा, त:हावद, दलेलपूर या गावांची येथील कृषी विभागाने निवड केली आहे. या शेतीशाळेसाठी प्रत्येक गावातील 25 शेतक:यांचा गट तयार करण्यात आला आहे. ऊस, कापूस, मका, सोयाबीन, तूर ही पिके या कार्यक्रमासाठी घेण्यात आली आहे.शेती क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक प्रत्यक्ष क्षेत्रावर जावून शेतक:यांना शेती शाळेचे नियोजन, पीक प्रात्यक्षिक, नांगरटीपासून तर पीक काढणीर्पयत मार्गदर्शन करणार आहेत. अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन यावर प्रमुख भर राहणार आहे. वर्षभरात एकूण आठ मार्गदर्शन वर्ग प्रत्येक गावात घेण्यात येतील. त्यात उसासाठी दोन, कापूस 12, मुंग दोन, सोयाबीन दोन, तूर एक अशा एकूण 19 शेती शाळा घेण्यात येणार आहेत. 15 दिवसांच्या कालावधीमध्ये एक मार्गदर्शन वर्ग घेण्यात येईल. कृषी विभागाच्या या कार्यक्रमाची अंमलबजावणी येथील कृषी कार्यालयाकडून हाती घेण्यात आली असून, तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथील शेतक:यांना तीन दिवसांपूर्वीच मार्गदर्शन करण्यात आले आहे. पिकांबाबत अधिका:यांकडून सखोल मार्गदर्शन मिळत असल्याने शेतक:यांनी समाधान व्यक्त केले आहे. साधारण 25 शेतक:यांच्या गटाची मर्यादा असली तरी मोठय़ा प्रमाणात शेतकरी मार्गदर्शन वर्गात उत्साहाने सहभागी होत असल्याचे तळोदा कृषी कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

शेती शाळेच्या कार्यक्रमासाठी कृषी विभागाने अनुदानदेखील उपलब्ध करून दिल आहे. प्रत्येक शाळेसाठी साधारण 14 हजाराचे अनुदान देण्यात आले आहे. या अनुदानातून तालुका कृषी प्रशासनाने सहभागी शेतक:यांना अल्पोपहार, कीडरोग व्यवस्थापन माहिती पुस्तिका व इतर सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत. याशिवाय बाहेरील कृषी तज्ज्ञाचे मानधनही द्यायचे आहे.