शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

नंदुरबार जिल्ह्याला २५० मेगावॅट विजेची अतिरिक्त आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 08:19 IST

उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.राज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे.

नंदुरबार - उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.

सध्या जिल्ह्यात नंदुरबार, विसरवाडी, तळोदा, शहादा तसेच समशेरपूर या पाच अतिउच्चदाब असलेल्या उपकेंद्रातून तसेच ५८ विविध ठिकाणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी वाढली होती. ती साधारणत ३०० मेगावॅटपर्यंत गेलेली होती. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मे-जूनपर्यंत विजेच्या मागणीत अधिक वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता

राज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. सध्या राज्यात कोळशाचा पुरवठा बऱ्यापैकी होत असल्याने विजेची टंचाई भासणार नसल्याचे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एप्रिल महिना पूर्ण तसेच मे व जूनपर्यंत ही मागणी २१ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वसाधारण दिवसांमध्ये राज्यात १५ हजार ६०० मेगावॅटपर्यंत वीजेची आवश्यकता असते. वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कृषीपंपाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असते़ ग्रामीण भागात वीज बचत करण्यासाठी अनेक वेळा भारनियमनाचा मार्गदेखील अंमलात आणला जात असतो. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कृषीपंपाचा वापर वाढला असल्याने मुख्यत्वे दिवसा वीज वितरणावर मोठ्या प्रमाणात लोड येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

उकाड्यात झाली वाढ

तापमान व आद्रता वाढली असल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असतो. त्यामुळे नागरिकांकडून फ्रीज, एसी, कुलर पंखे आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच दिवसा व रात्रीची मोठ्या प्रमाणात वीजेची मागणी वाढत असते. जिल्ह्यात उद्योग-धंदे नसले तरी घरगुती वापर, शेती क्षेत्रात होणारा विजेचा वापर बघता वीजेची मोठी मागणी आहे. नंदुरबार शहराचा विचार करता, नंदुरबारात नेहरु नगर, एकता नगर, पातोंडा येथील उपकेंद्राव्दारे साधारणत: सात ते आठ मेगावॅटचा वीजपुरवठा करण्यात येत असतो. नंदुरबार शहरात उन्हाळ्यात ७० लाख युनीटची मागणी असते़ तीच मागणी सामान्य दिवसांमध्ये ५० लाख युनिटपर्यंत जात असते. 

वीज पुरवठ्याची फ्रिक्वेंन्सी कमी-अधिक

उन्हाळा असल्याने वीजच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे. दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्यावर लोड पडत असल्याने वीज पुरवठ्याची फ्रिक्वेंन्सी कमी-अधिक होत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारीदेखील नंदुरबारात कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा होत असल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. वीज पुरवठ्यावर पडणारा ताण लक्षात घेता अनेक वेळा अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याची समस्यादेखील जाणवत आहे. ग्रामीण भागात तर भर दिवसा वीज खंडित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. आधीच उन्हाचे चटके त्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती