शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
2
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
3
२७७ प्रवासांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले
4
बांगलादेशी तयार कपड्यांना भारतीय बंदरांची दारे बंद, परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाकडून अधिसूचना जारी
5
सॉफ्टवेअर इंजिनिअर्ससाठी धोक्याची घंटा! ओपन एआयचा कोडिंग, डीबगिंग करणारा कोडेक्स AI लाँच झाला
6
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
7
अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले 
8
२३ हजार ३३१ हेक्टरला वळवाचा बसला फटका, या पिकांचं मोठं नुकसान?
9
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
10
एक देश एक निवडणूक : ४.५० लाख कोटींची बचत; मतदानही होईल ९० टक्के! संसदीय समितीचा अंदाज 
11
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
12
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
13
इंद्रायणी पूररेषेतील ३६ बंगले जमीनदोस्त
14
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
15
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
16
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
17
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
18
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
19
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
20
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला

नंदुरबार जिल्ह्याला २५० मेगावॅट विजेची अतिरिक्त आवश्यकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 08:19 IST

उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.राज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे.

नंदुरबार - उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून सद्य स्थितीत जिल्ह्याला २५० मेगावॅट वीजेची आवश्यकता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर नंदुरबार शहरातदेखील आठ मेगावॅटची मागणी आहे.

सध्या जिल्ह्यात नंदुरबार, विसरवाडी, तळोदा, शहादा तसेच समशेरपूर या पाच अतिउच्चदाब असलेल्या उपकेंद्रातून तसेच ५८ विविध ठिकाणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात विजेची सर्वाधिक मागणी वाढली होती. ती साधारणत ३०० मेगावॅटपर्यंत गेलेली होती. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने मे-जूनपर्यंत विजेच्या मागणीत अधिक वाढ होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

राज्यात १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता

राज्यात सध्या १९ हजार ४३३ मेगावॅट विजेची आवश्यकता आहे. सध्या राज्यात कोळशाचा पुरवठा बऱ्यापैकी होत असल्याने विजेची टंचाई भासणार नसल्याचे महावितरणच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. एप्रिल महिना पूर्ण तसेच मे व जूनपर्यंत ही मागणी २१ हजार मेगावॅटच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सर्वसाधारण दिवसांमध्ये राज्यात १५ हजार ६०० मेगावॅटपर्यंत वीजेची आवश्यकता असते. वाढत्या तापमानामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. त्यामुळे शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पाण्याअभावी पीक वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने शेतकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कृषीपंपाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीजेची आवश्यकता असते़ ग्रामीण भागात वीज बचत करण्यासाठी अनेक वेळा भारनियमनाचा मार्गदेखील अंमलात आणला जात असतो. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कृषीपंपाचा वापर वाढला असल्याने मुख्यत्वे दिवसा वीज वितरणावर मोठ्या प्रमाणात लोड येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

उकाड्यात झाली वाढ

तापमान व आद्रता वाढली असल्याने साहजिकच मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत असतो. त्यामुळे नागरिकांकडून फ्रीज, एसी, कुलर पंखे आदींचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. त्यामुळे साहजिकच दिवसा व रात्रीची मोठ्या प्रमाणात वीजेची मागणी वाढत असते. जिल्ह्यात उद्योग-धंदे नसले तरी घरगुती वापर, शेती क्षेत्रात होणारा विजेचा वापर बघता वीजेची मोठी मागणी आहे. नंदुरबार शहराचा विचार करता, नंदुरबारात नेहरु नगर, एकता नगर, पातोंडा येथील उपकेंद्राव्दारे साधारणत: सात ते आठ मेगावॅटचा वीजपुरवठा करण्यात येत असतो. नंदुरबार शहरात उन्हाळ्यात ७० लाख युनीटची मागणी असते़ तीच मागणी सामान्य दिवसांमध्ये ५० लाख युनिटपर्यंत जात असते. 

वीज पुरवठ्याची फ्रिक्वेंन्सी कमी-अधिक

उन्हाळा असल्याने वीजच्या मागणीत मोठी वाढ झालेली आहे. दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्यावर लोड पडत असल्याने वीज पुरवठ्याची फ्रिक्वेंन्सी कमी-अधिक होत आहे. मंगळवारी रात्री व बुधवारी दुपारीदेखील नंदुरबारात कमी-अधिक दाबाचा वीजपुरवठा होत असल्याचा अनुभव नागरिकांना आला होता. वीज पुरवठ्यावर पडणारा ताण लक्षात घेता अनेक वेळा अवेळी वीजपुरवठा खंडित होण्याची समस्यादेखील जाणवत आहे. ग्रामीण भागात तर भर दिवसा वीज खंडित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. आधीच उन्हाचे चटके त्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत.

 

टॅग्स :electricityवीजagricultureशेती