गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे अपघात, एकही मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST2021-07-29T04:30:49+5:302021-07-29T04:30:49+5:30
नंदुरबार : कानाला मोबाइल लावत दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढत आहे. या वाहनधाकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली ...

गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्यांचे अपघात, एकही मृत्यू नाही
नंदुरबार : कानाला मोबाइल लावत दुचाकी चालविणाऱ्यांचे प्रमाण शहरात वाढत आहे. या वाहनधाकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. दरम्यान, शहरात गेल्या दीड वर्षात अपघात होऊन एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
मोबाइलवर बोलत वाहन चालवू नये असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर नियमाप्रमाणे दंड वसूल केला जातो.
ब्रेथ ॲनालायझरचा वापर मर्यादित
पोलिसांच्या वाहतूक शाखेकडे ब्रेथ ॲनालायझर आहे. मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी हे यंत्र आहे; परंतु त्याचा नियमित वापर होत नाही. ३१ डिसेंबर किंवा विशेष मोहिमेवेळीच हे यंत्र वाहतूक शाखेकडून बाहेर काढले जाते.
शहरात वाहन चालविताना प्रत्येकाने काळजी करून वाहन चालविण्याची आवश्यकता आहे.
शहरातील बहुतांश ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली असल्याचे सर्वश्रुत आहे. हे लक्षात घेऊन वाहन चालवावे.
काही जण वाहन चालविताना राँग साइडचा आधार घेत असतात, तसे केल्याने अपघात होण्याचा धोका असतो.