वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजनांना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST2021-04-26T04:27:15+5:302021-04-26T04:27:15+5:30
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजनांना गती दिली जात आहे. याअंतर्गत आकडीमुक्त करण्यासाठी वीज ...

वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजनांना गती
चिंचपाडा : नवापूर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात वीज चोरी रोखण्यासाठी उपाययोजनांना गती दिली जात आहे. याअंतर्गत आकडीमुक्त करण्यासाठी वीज कंपनीकडून वीज पुरवठ्यासाठी बंच केबल टाकण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.
चिंचपाडा परिसरात गेल्या काही वर्षांत वीजदाबाचा प्रश्न निर्माण होत होता. अनधिकृतपणे वीज चोरी होत असल्याने यातून नियमित ग्राहकांना वेळेवर वीज मिळत नसल्याचे वीज कंपनीकडून सांगण्यात येत होते. यातून वीजचोरी रोखण्यासाठी कंपनीकडून चिंचपाडा गावातील सर्व वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांवर बंच केबल टाकण्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे. यातून या भागातील ग्राहकांना नियमित व उच्च दाबाने वीज मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कंपनीकडून गेल्या काही काळात देण्यात आलेल्या वीज बिलांमध्ये दुरुस्तीची कामे अद्यापही पूर्ण करण्यात आलेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वीज कंपनीने गेल्या काही महिन्यांपूर्वी वाढीव बिले दिल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत होते. यातून नागरिकांनी वीज बिलांमध्ये कपात करून त्यांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली होती. यानुसार कंपनीकडे बिले देण्यात आली आहेत. परंतु अद्यापही अनेकांना याचा प्रत्यक्ष लाभ झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. याकडे कंपनीने लक्ष देण्याची मागणी आहे.