१८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:46 IST2020-06-25T12:46:15+5:302020-06-25T12:46:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण २७ हजार शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत़ ...

Aadhaar certification of 18,000 farmers completed | १८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण पूर्ण

१८ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील एकूण २७ हजार शेतकरी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र ठरले आहेत़ या शेतकऱ्यांची माहिती अपलोड केल्यानंतर त्यांचे आधार प्रामाणिकरण करण्याची कारवाई लॉकडाऊनमुळे रखडली होती़ ही प्रक्रिया गेल्या आठवड्यात पूर्ववत सुरू झाली असून यांतर्गत आजअखेरीस १८ हजार शेतकऱ्यांनी आधार प्रामाणिकरण करण्यासाठी ‘थंब’ दिले आहेत़
आधार प्रामाणिकरण पूर्ण करणाºया या शेतकºयांना आता केवळ खात्यावर शासनाने रक्कम देण्याची प्रतिक्षा आहे़ ही रक्कम मिळाल्यानंतर शेतकºयांवर असलेली कर्ज बँका वजा करुन उर्वरित रक्कम शेतकºयांना परत मिळणार आहे़ परंतु अद्याप शासनाने याबाबत कोणतीही सूचना केलेली नसल्याने बँका आधार प्रामाणिकरण पूर्ण झाल्याचे रिपोर्ट तयार करत आहेत़ जिल्ह्यात केवळ १० दिवसात अत्यंत वेगाने झालेल्या या प्रक्रियेतून शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला आहे़ एकीकडे २७ हजार शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र असल्याचे शासनाच्या पोर्टलवर दिसत असताना दुसरीकडे जानेवारी महिन्यात १५ राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आधार लिंक केलेल्या ३१ हजार ३६४ शेतकरी खातेदारांचे काय, असाही प्रश्न आता उपस्थित होतो आहे़ केवळ २७ हजार शेतकºयांची माहिती अपलोड केली गेली असल्याने उर्वरित पाच हजार शेतकºयांची माहिती अपलोड होणार आहे किंवा काही तांत्रिक त्रुटींमुळे ही माहिती भरणे बँकानी राखून ठेवले याबाबत माहिती देण्यात आलेली नाही़
आधार प्रामाणिकरण करणाºया शेतकºयांना मोबाईलद्वारे खात्यावर रक्कम आल्याचा मेसेज देण्यात येणार असल्याचे बँकांकडून सांगण्यात आले आहे़ यामुळे शेतकºयांची बँकांबाहेर होणारी गर्दी कमी होणार आहे़


जिल्ह्यातील एकूण ६ हजार ३४२ शेतकऱ्यांचे आधार प्रामाणिकरण अद्याप शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली आहे़ येत्या आठवड्यात हे सर्व कामकाज पूर्ण होणार आहे़ दरम्यान जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांना कृषी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याची माहितीही समोर आली आहे़ या शेतकºयांना २ कोटी ४६ लाख रुपयांचे पीककर्ज माफ करण्यात आले आहे़ ही कर्जमाफी जिल्हा बँककडून झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे़
जिल्हा बँकेचे सर्वाधिक १४ हजार ३१३ तर राष्ट्रीयकृत बँकांचे १७ हजार ५१ शेतकºयांच्या बँक खात्यांबाबत ही कारवाई सुरु आहे़ जिल्हा बँकेच्या कर्जमाफीची रक्कम ही ८५ कोटी १५ लाख ६६ एवढी आहे़ तर राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफीची रक्कम ही १५० कोटींच्या पुढे आहे़ ही रक्कम शासनाने शेतकºयांच्या खात्यावर दिल्यानंतर आधार प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या शेतकºयांना दिलासा मिळणार आहे़
सोमवारी जिल्ह्यातील १०३ राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखांंतर्गत पीककर्ज मेळावे घेण्यात आले होते़ मेळाव्यात कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांना बोलावले गेले होते़ यातील बहुतांश शेतकºयांनी नव्याने कर्जासाठी अर्जही केले आहेत़


जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्याकडील २७ हजार १३५ खात्यांचे अपडेशन करुन माहिती शासनाकडे पाठवून दिली होती़ यातील २४ हजार ७२० ही नियमित कर्जखाती आहेत़ यापैकी एकूण १८ हजार ३७८ जणांच्या आधार प्रामाणिकरणाची कारवाई शिल्लक आहे़ यातील १३८ बँक खाती विविध तक्रारींची असल्याने त्यांचे कामकाज थांबले आहे़ केवळ चार खात्यांच्या तक्रारींचे निरसन झाल्याने त्यांचे आधार प्रामाणिकरण होणार आहे़ जिल्हास्तरीय समितीकडे २५ खात्यांच्या तक्रारी प्रलंबित असून त्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़


४जिल्हास्तरावर सोबत तहसीलदार यांच्याकडेही कर्जमुक्ती योजनेंतर्गत येणाऱ्या कर्जखात्याबाबत तक्रार करण्याचे शेतकऱ्यांना सुचवले गेले होते़ यात १०२ तक्रारी तहसीलदारांकडे प्रलंबित आहेत़ तर सात तक्रारी ह्या निकाली काढल्या आहेत़
आधार प्रामाणिकरण होणाºया खात्यांमध्ये सर्वाधिक खाती ही जिल्हा बँकेची आहेत़ तब्बल १२ हजार शेतकºयांच्या खात्यांचे आधार प्रामाणिकरण झाल्याची माहिती आहे़


शासनस्तरावरुन आधार अपडेशन करुन घेण्याचे आदेश आहेत़ त्यानुसार कारवाई सुरु आहे़ पुढील निर्णय शासन घेणार आहे़ बँकांनी अपलोड केलेल्या माहिती आधारे प्रामाणिकरण करण्यात येत आहे़
-अशोक चाळक,
जिल्हा उपनिबंधक, नंदुरबाऱ

Web Title: Aadhaar certification of 18,000 farmers completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.