जिल्ह्यातील 88 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:20 IST2019-07-23T12:20:05+5:302019-07-23T12:20:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ ...

जिल्ह्यातील 88 टक्के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दुष्काळ छायेत असलेल्या शेतक:यांना पावसाने दिलासा दिल्याने 88 टक्के क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत़ पावसामुळे उत्साह दुणावल्याने शेतक:यांनी कापसासह इतर खरीप पिकांची पेरणी करण्यास वेग दिला असल्याने येत्या दोन दिवसात किमान 101 टक्के शेतीक्षेत्रात पूर्ण होण्याची शक्यता आह़े
गेल्या वर्षी अल्पपजर्न्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागल्याने शेतकरी हैराण झाले होत़े यंदा जून महिन्याच्या मध्यात पावसाने यथातथा हजेरी लावल्याने चिंता वाढल्या होत्या़ यामुळे शेतशिवारात पेरण्यांची स्थिती बिकट होती़ यंदाही दुष्काळा भोगावा लागतो की, काय अशी स्थिती असताना गेल्या दोन दिवसात पावसाने जिल्ह्यात सर्वदूर जोर धरल्याने पेरणी केलेल्या पिके तरारली आहेत़ दुसरीकडे पावसाअभावी थांबलेल्या पेरण्यानांही वेग देण्यात आला असून शेतातील ओलव्याच्या बळावर कामे आटोपण्यास शेतकरी भर देत असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान नंदुरबार आणि नवापुर तालुक्यात गत 15 दिवसांपासून पावसाअभावी थांबलेली शेतीकामे गत दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पुन्हा वेगात सुरु झाल्याचे चित्र आह़े
जिल्ह्यात आजअखेरीस भात 48 टक्के, ज्वारी 89, बाजरी 33, मका 84, तूर 94, मूग 57, उडीद 77, भूईमूग 82, सोयाबीन 65 तर 114 टक्के क्षेत्रात कापसाची लागवड पूर्ण झाली आह़े
नंदुरबार तालुक्यात आजअखेरीस 55 हजार 977, नवापुर 42 हजार 927, शहादा 69 हजार 107, धडगाव 17 हजार 254, तळोदा 20 हजार 779 तर अक्कलकुवा तालुक्यात 40 हजार 511 हेक्टर क्षेत्रात पिकांचा पेरा पूर्ण झाल्याची माहिती आह़े सर्वाधिक 107 टक्के पेरणी ही शहादा तालुक्यात करण्यात आली असून तुलनेने माघारी असलेल्या नवापुर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतीकामांना सुरुवात झाली आह़े
शेतक:यांनी यंदाही कापसाला सर्वाधिक पसंती दिली असल्याने लागवड क्षेत्रातून दिसून येत आह़े यंदा 1 लाख 6 हजार क्षेत्रात सरासरी कापूस लागवड होण्याची शक्यता होती़ परंतू शेतक:यांनी यापेक्षा अधिक कापूस लागवड केली आह़े नंदुरबार तालुक्यात 37 हजार 505, नवापुर8 हजार 411, शहादा 35 हजार 488, तळोदा 9 हजार 798, धडगाव 91 तर अक्कलकुवा तालुक्यात 14 हजार 13 हेक्टर असा एकूण 1 लाख 21 हजार 676 हेक्टर क्षेत्रात कापूस लागवड करण्यात आली आह़े अक्कलकुवा वगळता सर्वच तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक कापूस लागवड झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े जिल्ह्यात 2 लाख 77 हजार 821 हेक्टर क्षेत्रापैकी 2 लाख 45 हजार 555 हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी यात कापसाचा सर्वाधिक वाटा आह़े यात वाढ होणे अपेक्षित असल्याने येत्या काळात निर्धारित क्षेत्रात 20 ते 25 टक्के अधिक क्षेत्रात पिकांची पेरणी पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े कापसानंतर दुस:या क्रमांकाच्या पसंतीचे पिक म्हणून सोयाबीनला पसंती दिल्याचे चित्र असून 17 हजार 636 हेक्टर पेरणी पूर्ण झाली आह़े