सामूहिक विवाह सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:42 IST2020-02-05T21:42:19+5:302020-02-05T21:42:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ शहादा-नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री संतसेना नाभिक ...

सामूहिक विवाह सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : समस्त गुजर नाभिक समाज पंच मंडळ शहादा-नंदुरबार विभाग यांच्या सहकार्याने व श्री संतसेना नाभिक समाज सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी येथे सामूहिक विवाह सोहळा झाला. नाममात्र एक रुपया नोंदणी फी घेऊन या सोहळ्यात २६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले.
शहादा तालुका खरेदी-विक्री संघाच्या प्रांगणात गुजर नाभिक समाजाचा सातवा तर समाज सेवा मंडळातर्फे पहिला सामूहिक विवाह सोहळा झाला. या वेळी आमदार राजेश पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, तळोद्याचे नगराध्यक्ष अजय परदेशी, जि.प.चे शिक्षण सभापती अभिजित पाटील, बांधकाम सभापती जयश्री पाटील, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, मराठा सेवा संघाचे समन्वयक श्यामभाऊ जाधव, अरुण चौधरी, प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी, प्राचार्य मकरंद पाटील, पं.स. सदस्य शिवाजी पाटील, सुनील सखाराम पाटील, रवींद्र राऊळ, ज्ञानेश्वर चौधरी, डॉ.कांतीलाल टाटिया, डॉ.योगेश चौधरी, प्रा.संजय जाधव, वर्षा जाधव, नगरसेवक संजय साठे, आनंदा पाटील, नगरसेवक योगिता वाल्हे, वर्षा जव्हेरी, संतोष वाल्हे, नाना निकुंभ, विजय कदम, संजय राजपूत, अतुल जयस्वाल, दिनेश खंडेलवाल, डॉ.किशोर पाटील, दिलीप गांगुर्डे, यशवंत चौधरी, प्रा.लियाकत सैयद, नासीर पठाण, जितेंद्र जगदाळे, विनोद जैन आदी उपस्थित होते.
सकाळी नऊ वाजता वरांची श्री सिद्धेश्वर गणेश मंदिरापासून सजवलेल्या ट्रॅक्टरवरुन वरात काढण्यात आली. त्यानंतर ११ वाजता मोठ्या उत्साहात २६ जोडप्यांचे शुभमंगल लावण्यात आले. या विवाह सोहळ्याला महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश सहा ते सात हजार वºहाडी मंडळी उपस्थित होते. वधू-वरांसाठी स्वतंत्र स्टेज व त्यांच्या समोरच नातेवाईकांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पुरोहित, फोटोग्राफर, व्हिडिओ चित्रीकरण, भोजनावळ, पिण्याचे पाणी, फिरते स्वच्छतागृह, मंडपात सी.सी. टीव्ही कॅमेरा, वाहनतळ आदी सुविधा आयोजकांनी केल्या होत्या.
दीपक पाटील म्हणाले की, सामूहिक विवाह ही काळाची गरज असून नाभिक समाजाने वेळेवर विवाह लावून नियोजनबद्ध पद्धतीने कार्यक्रम आयोजित करून आदर्श निर्माण केला आहे. विजय चौधरी म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळा पद्धतीमुळे परिवार व समाजात एकोपा निर्माण होते. गुजर नाभिक समाजाने सामूहिक विवाह सोहळ्याचे सातत्य कायम ठेवावे, असे सांगितले. या सोहळ्यासाठी धर्मदाय आयुक्त, महिला बालकल्याण विभाग, समाजातील विविध गावातील संस्था, संघटना, तरूण, महिला मंडळ यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा.अनिल साळुंके, व प्रा.हितेंद्र जाधव तर आभार प्रा.गणेश कन्हैया यांनी मानले. गुजर नाभिक समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.
विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र, संसारोपयोगी साहित्य, अस्थिव्यंग विद्यार्थ्यांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. वृक्षाचे रोप देऊन नवदाम्पत्यांची बिदाई करण्यात आली.
सोहळ्यासाठी आलेले वधू-वरांचे हजारो नातेवाईक शिस्तीने रांगेत बसले होते. हा सोहळा दोन दिवस असल्याने त्यादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी ३६ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.
श्री महावीर सहकारी पतसंस्था, सरदार वल्लभभाई पटेल पतसंस्था, संत सेना नाभिक कारागीर पतसंस्था व श्यामभाऊ दिनकर जाधव व समस्त जाधव परिवारातर्फे सामूहिक विवाह सोहळ्याला देणगी जाहीर करण्यात आली.