जिल्ह्यात २० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:32 IST2021-07-30T04:32:47+5:302021-07-30T04:32:47+5:30

नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक सधन कुटुंबांकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे कार्ड असून ते गरिबांच्या योजना पळवीत असल्याचे चित्र आहे. याबाबत ...

20% of the people in the district are below the poverty line | जिल्ह्यात २० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली

जिल्ह्यात २० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली

नंदुरबार : जिल्ह्यातील अनेक सधन कुटुंबांकडे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे कार्ड असून ते गरिबांच्या योजना पळवीत असल्याचे चित्र आहे. याबाबत नव्याने सर्वेक्षण करून अशा लोकांची नावे यादीतून काढून टाकणे गरजेचे ठरणार आहे. यासाठी यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले असून त्याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचे चित्र आहे. राज्यपातळीवरूनच याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.

n जिल्ह्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची संख्या धडगाव व अक्कलकुवा तालुक्यांत सर्वाधिक आहे. सर्वांत कमी नंदुरबार तालुक्यात आहे.

n आदिवासी दुर्गम भागात अनेक कुटुंबांकडे स्वत:चे पक्के घर नाही. शिवाय दरडोई उत्पन्नही कमी आहे. त्यामुळे धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील ८५ टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखालील निकषांत बसत असून त्यांना त्याचा लाभही मिळत आहे.

निकषांत बसत नसतानाही लाभ...

n जिल्ह्यातील अनेक कुटुंबे ही दारिद्र्यरेषेखालील सर्वेक्षणाच्या निकषांत बसत नसतानाही त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले आहे.

n वास्तविक दारिद्र्यरेषेेखालील कुटुंबांसाठीचे निकष अनेक असताना त्याची खातरजमा न करता अशा कुटुंबांना पिवळे कार्ड यापूर्वी देण्यात आले आहे.

n नव्याने सर्व्हे केला तर अनेक कुटुंबे यातून बाद होऊ शकतील. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.

Web Title: 20% of the people in the district are below the poverty line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.