शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

कर्ज पुनर्रगठणासाठी 17 हजार शेतकरी ठरणार पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहिर झाल्यानंतर विविध सवलतीही लागू झाल्या आहेत़ यात कजर्पुनर्गठनाची तरतूद ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळग्रस्त जाहिर झाल्यानंतर विविध सवलतीही लागू झाल्या आहेत़ यात कजर्पुनर्गठनाची तरतूद असून जिल्ह्यातील 17 हजार शेतकरी या प्रक्रियेस पात्र ठरणार आहेत़ परंतू ही सवलत मिळवून घेण्यासाठी बँकेत संमतीपत्र द्यावे लागणार असल्याने ही सवलतही शेतक:यांना मृगजळ भासू लागली आह़े जिल्ह्यातील 11 राष्ट्रीयकृत आणि धुळे व नंदुरबार जिल्हा  बँकेच्या 31 शाखांमधून यंदाच्या खरीप हंगामाकरिता 17 हजार 628 शेतक:यांना खरीप पिककर्जाचा पुरवठा करण्यात आला होता़ नंदुरबार, नवापूर, तळोदा आणि शहादा या चार दुष्काळग्रस्त तालुक्यातील 16 हजार 900 शेतक:यांनी पीक कर्ज घेतले असल्याने त्यांना कर्ज पुर्नगठनाचा थेट लाभ मिळणार आह़े या शेतक:यांना 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात बँकांनी एकूण 289 कोटी 49 लाख रूपयांचे पिक कर्ज वितरीत केले आह़े या कर्जाची परतफेड करण्याची वर्षभराची मुदत होती़ परंतू आता शासनाने दुष्काळ जाहिर करत पुर्नगठन करण्याची सवलत जाहिर केल्याने वसुली थांबवण्यात आली आह़े  जिल्ह्यातील शेतक:यांचा सर्वाधिक भरवसा असलेल्या जिल्हा बँकेची स्थितीही यंदा कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले आह़े बँकेने केवळ 51 टक्केच कर्ज वाटप केले असल्याने येत्या काळातील वसुलीवर त्याचा परिणाम जाणवणार असल्याचे बोलले जात आह़े 31 ऑगस्टर्पयत बँक ऑफ बडोदाने 1 हजार 254 शेतक:यांना 17 कोटी 61 लाख, बँक ऑफ इंडियाने 673 शेतक:यांना 7 कोटी 33 लाख, बँक ऑफ महाराष्ट्राने 1 हजार 313 शेतक:यांना 21 कोटी 12 लाख, कॅनरा बँकेने 45 शेतक:यांना 71 लाख, सेंट्रल बँकेने 2 हजार 29 शेतक:यांना 31 कोटी 30 लाख, देना बँकेने 568 शेतक:यांना 15 कोटी, आयडीबीआय बँकेने 910 शेतक:यांना 17 कोटी 13 लाख, पंजाब नॅशनल बँकेने 38 शेतक:यांना 38 लाख, स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 हजार 411 शेतक:यांना 86 कोटी 60 लाख, युनियन बँक ऑफ इंडियाने 1 हजार 99 शेतक:यांना 14 कोटी 90 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आह़े यंदा राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ 10 हजार 340 शेतक:यांना कजर्वाटप केले आह़े प्रत्यक्षात त्यांना 55 हजार शेतक:यांना कर्ज वाटप करण्याचे आदेश होत़े खरीप हंगामात 38 टक्केच कर्ज वाटप राष्ट्रीयकृत बँका करु शकल्याने त्यांच्याकडून वसुलीची सक्ती करण्यास सुरुवात झाली आह़े त्यातुलनेत जिल्हा बँकने यंदाच्या खरीप हंगामात धडगाव आणि अक्कलकुवा तालुका वगळता 5 हजार 581 शेतक:यांना 36 कोटी 64 लाख रूपयांचे कर्ज वाटप केले आह़े जिल्ह्यात केवळ 40 टक्के कजर्वाटप बँकींग नियमानुसार 1 लाख रूपयांच्यावर कर्ज असलेल्या शेतकरी सभासदाच्या कर्जाची पाच हप्त्यात विभागणी करून पाच वर्षार्पयत दीर्घ मुदत देण्यात येऊन कर्जाचे पुर्नगठन होत़े बँकांकडून कर्ज घेणा:या 17 हजार शेतक:यांची थकबाकी येण्यास मोठा कालावधी लागणार असल्याने बँकांचे अधिकारी या निर्णयाला अनुकुल नसल्याचे दिसून आले आह़े 1 नोव्हेंबर ते 31 मार्च या काळात बँकांकडून कर्ज वसुलीला सुरवात करण्यात येत़े शासनाकडून दुष्काळ जाहिर केल्यानंतर जिल्हा बँकेने कर्ज वसुली पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांकडून काही शेतक:यांच्या खात्यांवरुन पैसे कपात करून कर्जाचे हप्ते वसुल करण्यात आल्याची माहिती आह़े ब:याच शेतक:यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्यावर बोंडअळीचे पैसे आल्यानंतर त्याची परस्पर कपात झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या़यंदाच्या खरीप हंगामाच्या प्रारंभापासून पीक कर्ज वाटपात गोंधळ उडाला होता़ परिणामी सर्व बँका मिळून जिल्ह्यात 31 ऑगस्टअखेर्पयत सरासरी 40 टक्के कर्ज वाटप झाले आह़े 70 हजार शेतक:यांना कर्ज देणे गरजेचे असताना बँकांकडून केवळ 17 हजार 628 शेतक:यांनी पीक कर्ज घेतल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आह़े शेतक:यांना 2015 या वर्षात कजर्पुर्नठनाची सवलत राज्यात देण्यात आल्याची माहिती आह़े त्यावेळी बँकांकडून मोठय़ा कजर्धारक शेतक:यांनाच त्याचा लाभ देण्यात आला होता़ यातून कर्जाचे हप्ते लांबून व्याजदर वाढत असल्याने कर्ज पुर्नगठनास शेतक:यांनी नकार दिला होता़ या पाश्र्वभूमीवर यंदा शेतक:यांकडून संमतीपत्र घेण्याचा निर्णय सहकार विभागाकडून घेण्यात आल्याची माहिती आह़े शेतक:यांनी घेतलेल्या अल्पमुदत कर्जाचे दीर्घमुदतीत रुपांतर होण्याची प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागणार असल्याने कर्जावरील व्याजाचा दर 1 ते 4 टक्के वाढून शेतक:यांवर बोजा पडणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े राष्ट्रीयकृत बँकांकडून या पुर्नगठन प्रक्रियेसाठी मोठय़ा कजर्धारक शेतक:यांची निवड करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याने छोटय़ा शेतक:यांना पुर्नगठनाच्या सवलतीपासून दूर रहावे लागण्याची चिन्हे आहेत़   एकीकडे दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना दुसरीकडे पीककर्जाची वसुली प्रक्रिया टाळून मुदत वाढवून घेण्यासाठी शेतक:यांनाच फिरावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े