धनपूर धरणाच्या पाटचारीसाठी दीड कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:21 IST2020-03-17T12:21:18+5:302020-03-17T12:21:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : सहा वर्षापूर्वी काम पूर्ण होऊनही धनपूर ता. तळोदा येथील धरणातून पाटचारीअभावी सिंचनासाठी पाणी पुरवठा ...

धनपूर धरणाच्या पाटचारीसाठी दीड कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरद : सहा वर्षापूर्वी काम पूर्ण होऊनही धनपूर ता. तळोदा येथील धरणातून पाटचारीअभावी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात येत नव्हते. परंतु या प्रलंबित कामासाठी राज्य शासनामार्फत दीड कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे मोड, बोरद व खेडले यासह अन्य गावांमधील तब्बल २७२ हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरवठा होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तळोदा तालुका शेती समृद्ध असला तरी तालुक्यातील काही भागात उन्हाळी कालावधीत पाण्याची टंचाई निर्माण होत होती. यावर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी तालुक्यातील नागरिकांमार्फत आंदोलने करण्यात आली. आंदोलनाची फारशी दखल घेतली जात नसल्याने तालुक्यात पुन्हा कॉ. जयसिंग माळी यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती तयार करण्यात आली. या समितीमार्फत आमलाड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते, त्याची दखल घेत धनपूर येथे धरण बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामुळे या धरणाचे उद्घाटन २००८ मध्ये माजी उपसभापती दीपक मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्याचे काम २०१४ मध्ये पूर्ण झाले. परंतु परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यास आवश्यक असलेल्या पाचचारीचे काम झाले नव्हते. त्यामुळे काम पूर्ण होऊन सहा वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकºयांना पाणी वाटप करण्यात आले नव्हते. त्यामळे मुबलक जलसाठा असूनही शेतशिवार कोरडे होते. उर्वरित कामांसाठी राज्य शासनामार्फत नुकतेच दीड कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या मंजूर निधीतून सर्व कामे पूर्ण होण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे. वर्षानुवर्षे विकासापासून वंचित राहिलेल्या या भागाच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
धरण परिसरातील ७० टक्के आदिवासी शेतकºयांचा जमिनी सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे त्यांची शेती बागायती होऊन विविध पिके घेता येतील. आर्थिकदृष्ट्य त्यांना प्रगती करता येणार आहे. शिवाय परिसरातून रोजगारासाठी होणारे स्थलांतरांवर काही प्रमाणात नियंत्रण देखील आणता येणार आहे. निधी मिळविण्यासाठी पालकमंत्री तथा आदिवासी विकाम मंत्री अॅड. के.सी.पाडवी यांचे योगदान लाभले.
धनपूर धरण सातपुडा पर्वतातून उगम पावणाºया निझरा या नदीवर बांधण्यात आले आहे. धनपूर धरण साकारावे म्हणून १९९६ पासून आजतागायत, मोर्चे, उपोषण, निवेदन, घेराव, रस्ता रोको आदी मार्गांनी आंदोलने केली. त्यानंतर सुमारे २५ वर्षानंतर शेतकºयांचे स्वप्नांना आकार मिळाला. धरणात मुबलक जलसाठा असूनही बांधापर्यंत पाणी पोहोचत नव्हते. पाटचाºयांचे बांधकाम करणे आवश्यक आहे.