शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

बेरोजगारीवर मात करी, सहकारी भाजीपाला लॉरी ! 14 युवकांनी शोधला आर्थिक उन्नतीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 10:31 IST

सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे.

भूषण रामराजे/ नंदुरबार : 'सुरत येथील बाजारात माल घेऊन गेलो. मात्र, तेथे मालाची आवक वाढली की भाव पडायचे. व्यापारी मालाकडे दुर्लक्ष करायचे, आर्थिक नुकसान व्हायचं, शेवटी मग आम्हीच ठरविले आणि रस्त्यावर भाजीपाला विकला, पहिला प्रयत्न फसला, परंतु आता सहकारी भाजीपाल्याची लॉरी दौडू लागली आहे'. हे मनोगत आहे, चंदू गावीत ( रा बोकळझर, ता नवापूर, जि़ नंदुरबार) याचं नवापूर तालुक्यात फुललेल्या गटशेती चळवळीचा चंदू हा एक शिलेदार. ११५ एकरावर होणारी भेंडी शेती, काकडी, नर्सरीची गटशेती, औजार बँक यासह विविध उपक्रम तो राबवित आहे. आदिवासी युवकांमध्ये स्वाभिमान जगविण्याचं काम चंदू करत आहे़ त्यांच्या ‘सहकारी लॉरी’ची जन्मकथा ही एका नव्याच संकल्पनेची ओळख म्हणावी.

नवापूर तालुका हा तूर आणि भाताच्या विविध वाणांसाठी ओळखला जातो़ याच तालुक्यात गत १० वर्षात गटशेतीतून भाजीपाला उत्पादनाचे प्रयत्न सुरू झाले़ सुरुवातीला राज्याच्या विविध भागातील कृषी संस्थांच्या आधाराने फुललेला भाजीपाला गुजरात राज्यातील सुरत, बारडोली आणि वापी इथे जात होता. गेल्या दोन वर्षात पाऊस आणि इतर समस्यांनी गटशेतीला घेरले, गट विखुरले़ यातच चंदू गावीत हे सुरत येथे भाजीपाला विक्रीसाठी गेले असता, भाव पडल्याने भाजीपाला सोडावा लागला. या संकटातून मार्ग निघाला. सुरत येथेच भाजीपाला विक्रीचा स्टॉल लावला. पहिल्या प्रयत्नात भेंंडी विक्री झाली़, आणि येथूनच सहकारी लॉरी सुरू करण्याची कल्पना उदयास आली.

नवापूर तालुक्यात २५ एकरात चंदू गावीत ही गटशेती करतात़ यात प्रमुख उत्पादन म्हणजे भेंडी, मेथी आणि कोथिंबीर. हा भाजीपाला घेत, सर्व १४ जणांनी बारडोली आणि परिसरात लॉरी भाड्याने घेत भाजीपाला विकला आणि उत्पादनाच्या ३० टक्के नफा मिळाला़ किरकोळ यश असले तरी त्यातून नवा मार्ग सापडला़ यातून ग्रामीण भागात १० आणि नवापूर, चिंचपाडा, विसरवाडी व खांडबारा येथे चार मोठ्या लॉरी आणि त्याला दिवसभर भाजीपाला आणून देणारे वाहन याची जोड दिली. आजघडीस नवापूर तालुक्यात सुरू असलेल्या १५ लॉरींवर दर दिवशी एक क्विंटल भाजीपाला विक्री केला जातो़ केवळ स्वत: पिकवलेला भाजीपाला विक्री करून यश मिळणार नाही, हे जाणून गावीत व त्यांचे सहकारी इतर शेतक-यांसोबत संपर्क साधून त्यांचा भाजीपाला खरेदी करतात.

शेतक-यांना कोणत्याही प्रकारे वाहतूक खर्च, मार्केट फी, आडत कमिशन द्यावे लागत नाही. दर दिवशी १५ लॉरींवर किमान १० प्रकारच्या भाज्यांची विक्री झाली पाहिजे असे टार्गेट ठेवून काम केले जात आहे़ आलेला पैैसा एकत्र करून तो बँकेत भरला जातो. महिन्याच्या १ तारखेला उत्पादन खर्च वजा जाता मिळालेला नफा सर्वांमध्ये वाटला जातो, अगदी साध्यासोप्या आणि सरळ अशा व्यवहारामुळे महिन्याकाठी प्रत्येकाच्या गाठीला २५ हजार रुपयांपर्यंत रक्कम हाती पडत असते.

भेंडी आणि काकडीतून आर्थिक स्थैैर्याकडे- चंदू गावीत याच्यासोबतच हिरामण वळवी, वीरसिंग कोकणी, होबील गावीत, शंकर गावीत, जालमसिंग गावीत, वीरसिंग गावीत, वेच्या गावीत, नीलेश गावीत, दिनकर गावीत, बाबू गावीत, जिवल्या गावीत, आरसीगावीत हे १४ सहकारी लॉरीच्या प्रयोगात सातत्याने राबत आहेत.

- २५ एकर क्षेत्रात सध्या उत्पादन येत असलेल्या भेंडीला ७० हजारांपर्यंत एकरी खर्च येतो़ गेल्या दोन महिन्यात १०० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी विकून एकरी १ लाखाचा खर्च त्यांनी वसूल केला आहे़ अद्यापही भेंडी विक्री सुरू आहे़ दारोदार फिरून का होईना उत्पादन येणार, असा ठाम विश्वास असल्याने प्रत्येक जण नेमून दिलेल्या गावातील लॉरीवर सकाळी आठ वाजता पोहोचत आहे.

- गेल्या वर्षी सहकारी लॉरीतून युवकांनी १५ गुंठ्यात लागवड केलेली काकडी विकली होती़ ५५ हजार रुपये एकरी खर्च असलेल्या काकडीचे १८ टन उत्पादन आले. यातून एक लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत मिळत होते.

- शेतक-यांचा भाजीपाला थेट ग्राहकाच्या घरात ही संकल्पना रूढ करण्याचा प्रयत्न करणा-या या युवकांनी भाजीपाला पेरणीसाठीचा खर्चही स्वत:च घरातून उभा केला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीvegetableभाज्या