14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:29 IST2019-07-23T12:29:35+5:302019-07-23T12:29:40+5:30
नरेंद्र गुरव । लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील 14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पावसाळा सुरू ...

14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये अद्यापही ठणठणाट
नरेंद्र गुरव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : शहादा, धडगाव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील 14 लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरी आजच्या स्थितीला ठणठणाट आहे. यातील काही लघुप्रकल्पांना गळती लागली असून ती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
पाटबंधारे विभागाच्या शहादा उपविभागांतर्गत तळोदा तालुक्यात चार, अक्कलकुवा दोन, शहादा सात तर धडगाव तालुक्यात एक असे 14 लघुसिंचन प्रकल्प आहेत. तळोदा तालुक्यात रोझवा हे छोटे धरण असून त्यात 8.80 टक्के पाणीसाठा आहे. पाडळपूर प्रकल्पात 10.60 टक्के, सिंगसपूर 53 टक्के पाणीसाठा असून गढावली प्रकल्पात फक्त 0.28 टक्के साठा असून हा प्रकल्प कोरडाच असल्यासारखी स्थिती आहे. खडकुना प्रकल्पात 4.53 टक्के, महूपाडा 2.73 टक्के, शहादा तालुक्यातील दुधखेडा 11.07, खापरखेडा 3.96 टक्के, कोंढवळ 3.29, लोंढेरे 2.00 टक्के, लंगडी भवानी 6.14 टक्के, शहाणे 2.55 टक्के, राणीपूर 19.09 टक्के तर उमराणी लघुपप्रकल्पपात फक्त 0.75 टक्के एवढाच पाणीसाठा आहे. यातील कोंढावळ, लोंढेरे व रोझवा या लघुसिंचन प्रकल्पांना गळती लागल्याने या प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे.
एकंदरीत या सर्व लघुसिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा पाहता चिंतेचा विषय आहे. चिपळूण तालुक्यात धरण फुटल्यानंतर जळगाव येथील अधीक्षक अभियंता एस.जे. वंजारी व धुळे येथील कार्यकारी अभियंता एस.जी. शहापुरे यांनी भेट दिली. यातील काही प्रकल्पांना लागलेली गळती थांबविणे व जास्तीत जास्त पाणीसाठा होण्यासाठी प्रकल्पांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. त्यासाठी मात्र स्थानिक अधिका:यांनी लक्ष देण्याची आवश्यकता असताना त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून पावसाची अनियमितता पाहून हे प्रकल्प भरतील की नाही, अशी चिंता या प्रकल्प परिसरातील शेतक:यांना लागली आहे. तेव्हा हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कसे भरतील यासाठी संबंधित विभागाच्या अधिका:यांनी बैठक घेऊन उपाययोजना आखण्याची गरज आहे. वर्षभरात या प्रकल्पांवर दुरुस्ती व इतर कामांच्या नावाखाली खर्च होतो. मात्र प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा का होत नाही याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेतक:यांकडून होत आहे.