शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

12 शेतक:यांच्या वारसांना मिळाला विमा योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:08 PM

भूषण रामराजे ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अपघाती मृत्यू झाल्याने निराधार होणा:या शेतक:यांच्या वारसांसाठी राज्यशासनाने 2015-16 मध्ये गोपीनाथ ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अपघाती मृत्यू झाल्याने निराधार होणा:या शेतक:यांच्या वारसांसाठी राज्यशासनाने 2015-16 मध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना पुर्नजिवित केली होती़ या योजनेतून गेल्या तीन वर्षात 12 मयत शेतक:यांच्या वारसांना लाभ मिळू शकला आह़े उर्वरित प्रकरणांवर चर्चा सुरु आह़े    2009-10 या वर्षात तत्त्कालीन राज्य सरकारने शेतकरी जनता अपघात विमा योजना सुरु केली होती़ व्यक्तीगत विमा योजनेचे नाव बदलून जनता अपघात विमा योजना सुरु करण्यात आली होती़ 2015-16 मध्ये या योजनेचे गोपीनाथ मुंडे  अपघाती विमा योजना असे नामकरण करण्यात आले होत़े पूर्वीच्या योजनेतील भरपाईची रक्कम 2 लाखांर्पयत करुन 12 प्रकारे अपघाती मृत्यू, अपंगत्त्व, डोळा निकामी होणे यासाठी 1 ते 2 लाख रुपयांची मदत शेतकरी किंवा त्यांच्या वारसांना करण्यात येणार होती़ 2016-17 या वर्षात नंदुरबार जिल्ह्यात घडलेल्या घटनांच्या आधारे मयत आणि अपघातग्रस्तांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे दिलेल्या प्रस्तावांतर्गत कामकाज करण्यात आले होत़े तीन वर्षात प्राप्त झालेल्या एकूण 35 प्रस्तावांपैकी 12 प्रस्ताव निकाली काढल्यानंतर उर्वरित 23 प्रस्तावांचे कामकाज गत तीन वर्षापासून सुरु असल्याची माहिती आह़े  यातील दोन मयत शेतक:यांचे प्रस्ताव नाकारण्यात आल्याची माहिती आह़े तरीही उर्वरित 21 प्रस्ताव हे विमा कंपन्यांकडे पाठवण्यात आल्याने त्यावर योग्य ती कारवाई झालेली  नसल्याची माहिती आह़े हे प्रस्ताव लवकर निकाली काढण्याची मागणी आह़े  विशेष म्हणजे सर्व 21 प्रस्ताव हे मयत शेतक:यांच्या वारसांनी दाखल केले आहेत़ शेतक:यांची प्रकरणे निकाली काढण्यासाठी वेळोवेळी होणा:या बैठकीत कृषी विभाग विमा कंपन्यांना धारेवर धरत असून येत्या महिन्यात योजनेचे कामकाज पूर्ण होणार आह़े कृषी अधिक्षकांचा पाठपुरावा अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या योजनेत रस्ते अपघातात मृत पावणा:या शेतक:यांच्या वाहन परवान्याबाबत अडचणी येतात़ राज्य कृषी विभागाच्या बैठकीत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ़ बी़एऩपाटील यांनी परवाने जुने किंवा मुदतबाह्य असल्याचा मुद्दा मांडून शेतक:यांची अडचण सांगितली होती़ त्यावर शासन दखल घेणार असल्याची माहिती असून वाहन परवान्याबाबत नियम शिथिल होऊ शकतो़ 

2018-19 या वर्षात अद्याप एकही प्रस्ताव दाखल करण्यात आलेला नसला तरी 2017-18 या वर्षात विविध प्रकारे अपघाती मृत्यू आलेल्या 18 शेतक:यांचे प्रस्ताव देण्यात आले होत़े यातील आठ प्रस्ताव त्रुटींमुळे पडून असल्याची माहिती आह़े तर नंदुरबार तालुक्यातील घोटाणे येथील  2 धामडोद, भालेर येथील 3, अक्राळे, नळवे खुर्द, ससदे आणि कौली ता़ शहादा येथून दाखल झालेल्या प्रत्येक 1 अशा 10 प्रस्तावांवर अद्यापही कारवाई झालेली नाही़ रस्ते अपघात, इलेक्ट्रीक शॉक, बुडून तसेच गाईच्या हल्ल्यात हे शेतकरी मृत्यूमुखी पडल्याची माहिती आह़े कृषी विभागाने आलेले प्रस्ताव विमा कंपनीकडे दिल्यानंतर त्यावर कामकाज सुरु असल्याचे सांगण्यात आले आह़े 2016-17 या वर्षात कृषी विभागाकडे 17 प्रस्ताव दाखल करण्यात आले होत़े यात 1 प्रस्तावात त्रुटी असल्याने तो बाजूला ठेवण्यात आला़ तर दोघांवर कारवाई सुरु ठेवण्यात येऊन 12 वारसांना दोन लाख रुपयांर्पयत मदत देण्यात आली़ यात भारकुंड, जांगठी, मोलगी, सल्लीबार, रोझकुंड ता़ अक्कलकुवा, भोणे ता़ नंदुरबार, मोरवड ता़ तळोदा, डोंगरगाव, मंदाणे ता़ शहादा, वावडी, वराडीपाडा ता़ नवापुर येथील वारसांचा समावेश आह़े या वर्षात होराफळी ता़ अक्कलकुवा आणि श्रीरामपूर ता़ नंदुरबार येथील दोघांचे प्रस्ताव नाकारले गेल़े वय अधिक व वाहन परवान्याअभावी हे प्रस्ताव नाकारले गेले आहेत़