शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

युवा शेतकऱ्याने ऊस शेतीला फाटा देत काबुली हरभऱ्यातून मिळवले भरघोस उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:30 PM

यशकथा : युवा शेतकऱ्याने या दोन्हीही पिकांना काबुली हरभऱ्याचा पारंपरिक पर्याय निवडला आहे. याद्वारे उत्पन्नात पूर्वीपेक्षा भरघोस वाढ करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे.

- युसूफमियाँ नदाफ ( पार्डी, जि. नांदेड )

अर्धापूर तालुक्यातील देळूब (बु.) गावाच्या शिवारात पाणी चांगले असून पूर्वी या गावात केळी, ऊस, हळद पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे़ मात्र केळीवर येणारे रोग, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान तसेच उसाला लागणारे जास्तीचे पाणी, दरामधील तफावत, वाढता खर्च याला कंटाळून येथील एका युवा शेतकऱ्याने या दोन्हीही पिकांना काबुली हरभऱ्याचा पारंपरिक पर्याय निवडला आहे. याद्वारे उत्पन्नात पूर्वीपेक्षा भरघोस वाढ करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे.

तालुक्यात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने देळूब येथील युवा शेतकरी नूरखान युसूफजई पठाण यांनी मोठ्या प्रमाणावर काबुली हरभऱ्याची पेरणी केली आहे, ते अगोदर मोठ्या क्षेत्रावर केळी व ऊस घ्यायचे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीन व मुख्य म्हणजे काबुली हरभरा पीक घेऊन त्यांनी शेतीची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून ४० ते ५० एकरावर काबुली हरभऱ्याची पेरणी करून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून हे पीक यशस्वी केले आहे. केळी पूर्णपणे थांबवून उसाची लागवड कमी करून काबुली हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात क्षेत्रात वाढ केली आहे 

नूरखान युसूफजई पठाण यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे ५० एकर जमीन असून, ते केळी  व ऊस पीक घेत होते. मात्र, या पिकाच्या समस्यांमुळे ते कमी करून कमी कालावधीतील सोयाबीन व हरभरा या पारंपरिक हंगामी पिकांकडे ते वळले. खरिपातील सोयाबीन काढल्यानंतर लगेच काबुली हरभरा पेरला. हे त्यांचे सातवे वर्षे आहे. हा हरभरा या परिसरात आणला तो  त्यांनीच. पहिल्या वर्षी त्यांनी फक्त सहा एकरवर तो घेतला. त्याचे मिळणारे उत्पन्न व दर लक्षात घेऊन पुढील वर्षी जास्त क्षेत्र वाढवीत नेले़ 

हरभऱ्याला थंडी चांगली मानवत असल्याने लवकरच पेरणीला सुरुवात करावी लागते़ जमीन भारी सुपीक व कसदार असावी.  एकरी सुमारे ५५ किलो बियाणे लागते. दरवर्षी बियाणात बदल करावा.बियाण्यांवर रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे बाद होण्याची शक्यता कमी असते. काबुली हरभऱ्याची पेरणी ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाते. त्याच वेळी खताची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी डीएपी खताचा वापर करावा तर पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी युरिया व पालाश खत दिला जातो.

पहिले पाणी पेरणीच्या वेळी, तर दुसरे २२ ते २५ दिवसांनी दिले जाते. त्यानंतर २५ दिवसांच्या अंतराने दोन सिंचन केले जातात. हरभऱ्याला कमी पाणी  लागत असल्याने तुषार संच फक्त चार तास चालवावा. काबुली हरभऱ्याचे घाटे एकदम टपोरे असतात. सुमारे चार वेळा तरी कीडनाशकाची फवारणी करावी लागते. गेल्या वर्षात ५० एकरमध्ये ७०० क्विंटल काबुली हरभरा झाला होता. त्याला ५४०० रुपये भाव मिळाला होता. हा भाव कमी मिळाला असला तरी खर्च व कमी कष्टामुळे  तो परवडल्याचे पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी