शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

यंदा शैक्षणिक सहलींना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 00:25 IST

शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे यंदा शालेय सहली काढण्यासाठी कुठलीही शाळा धजावत नसल्याची सध्या सर्वत्र परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

ठळक मुद्देशिक्षण विभागाच्या जाचक अटीत अडकल्या शाळा

धर्माबाद : शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे यंदा शालेय सहली काढण्यासाठी कुठलीही शाळा धजावत नसल्याची सध्या सर्वत्र परिस्थिती आहे. त्यामुळे यंदा शैक्षणिक सहलीला ‘ब्रेक’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.सहल ही शैक्षणिक उपक्रम मानला जातो. पर्यटनस्थळासह, ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक माहिती मिळवून त्याचे दर्शन घडावे, या उद्देशाने प्रत्येक शाळेत शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. यंदाही अनेक शाळांनी तशी तयारी केली होती. विद्यार्थ्यांमध्येही सहलीबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती; पण शिक्षण विभागाच्या जाचक अटीमुळे अनेक शाळांनी सहली न काढण्याचा विचार केला आहे.धर्माबाद तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५६ शाळा व खाजगी १२ शाळा आहेत. यावर्षी एकाही शाळेची सहल गेली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. डिसेंबर महिना आला की सहलीची सर्वच शाळांतून लगबग सुरू होते. मात्र शिक्षण विभागाने यावर्षी सहलीबाबत एक परिपत्रक काढून नियमावली दिली आहे. त्यात- अपघात होतील अशा निसर्गरम्यस्थळी सहल काढू नये, ज्ञानात भर पडेल अशा शैक्षणिक अभ्यासात्मक व संशोधनात्मक ठिकाणी सहली काढाव्यात, सहल नेणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी शंभर रुपयांच्या बाँडवर हमीपत्र लिहून देणे, सर्व विद्यार्थ्यांचा विमा उतरल्याच्या प्रती परवानगीसोबत जोडाव्यात, सहलीस जाणाºया विद्यार्थ्याच्या रक्तगटाची माहिती परवानगीसोबत जोडणे आवश्यक, सहलीस जाणारी मुले शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र मुख्याध्यापकांनी जोडणे बंधनकारक आहे तसेच पालक व विद्यार्थ्यांकडून हमीपत्र घेणे आवश्यक आहे़ या शिक्षण विभागाच्या जाचक अटी यावर्षी शैक्षणिक सहलीवर लावल्यामुळे अनेक शाळांमधून शैक्षणिक सहली नेण्याला ‘ब्रेक’ लागलेला दिसून येत आहे.किल्ले, वस्तूसंग्रहालयाचे ज्ञान मिळणार नाहीविविध प्रकारचे किल्ले, वस्तूसंग्रहालये, सांस्कृतिक ठिकाण, पर्यटनस्थळ, समुद्र किनारे ही ठिकाणे पाहणे आता विद्यार्थ्यांना अवघड बनणार आहे. यामुळे त्यांना प्रत्यक्ष ज्ञान मिळणार नाही.तसेच विविध घटकांचे अवलोकन होणार नाही. यामुळे विद्यार्थीदशेतील शैक्षणिक सहलीच्या आनंदाला विद्यार्थी मुकणार आहेत.विद्यार्थ्यांचा हिरमोडविद्यार्थ्यांमध्ये सहलीविषयी प्रचंड आकर्षण असते. कधी सहल निघेल, कुठे जाणार, कुठली प्रेक्षणीय स्थळे असतील याबाबत विद्यार्थ्यांमध्ये चर्चा आणि उत्सुकता असते. त्यासाठी महिनाभर आधीपासूनच तयारी सुरु केली जाते. यंदा मात्र सहलीविषयी शाळेत चर्चाच होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचाही हिरमोड झाला आहे.

टॅग्स :NandedनांदेडSchoolशाळाStudentविद्यार्थीtourismपर्यटन