शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महिलांची कोटीच्या कोटी उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 00:13 IST

महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी सावकारीलाही मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील बचत गटांनी केली ९६ कोटींच्या अंतर्गत कर्जाची उलाढाल

विशाल सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महिला बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आर्थिक चळवळ गतिमान होत आहे.‘मविम’ अंतर्गत असलेल्या आठ तालुक्यांतील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढी अंतर्गत कर्जाची उलाढाल केली आहे. या पद्धतीने अत्यंत कमी व्याजदारात कर्ज उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खाजगी सावकारीलाही मोठ्या प्रमाणात चाप बसला आहे.महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून जिल्ह्यात महिला बचत गटांची ही चळवळ जोम धरत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील १८१ गावांमध्ये या माध्यमातून प्रत्यक्ष काम सुरू असून या बचत गटांशी तब्बल २७ हजारांहून अधीधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून एकत्रित आणल्यानंतर या महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यास ‘मविम’च्या वतीने सुरूवात करण्यात आली. त्यातूनच या चळवळीने आर्थिकदृष्ट्या असे गोंडस बाळसे धरले आहे. गटाच्या माध्यमातून महिला एकत्रित आल्यानंतर त्यांना विविध लघुउद्योगांबाबत मार्गदर्शन देण्यात आले. त्यानंतर महिलांची आवड, उद्योगाची संधी आणि त्या भागाची निकड आदी बाबी तपासून हे गट उद्योगामध्ये उतरले.याचप्रमाणे महिला बचत गटांच्या माध्यमातून अर्धापूर, नायगाव, चैनपूर (ता. देगलूर) येथे कृषीसेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. तर २९ गावांमध्ये महिला बचत गटांच्या वतीने पशू खाद्यविक्री केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील ४० गावांत महिलांनी दुग्धव्यवसाय सुरू केला आहे. यात सुमारे १२०० महिला कार्यरत असून त्यांच्याकडे ३० ते १०० पशुधन आहे. शेळीपालनामध्येही महिला बचत गटांनी पुढाकार घेतला आहे. जवळपास २१०० महिला शेळीपालन व्यवसायामध्ये आहेत.माविमच्या वतीने जिल्ह्यातील सुमारे ७५० महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यातील बहुतांश महिलांनी स्थानिक पातळीवर व्यवसायाला सुरूवात केली आहे. या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देण्याचे काम या महिला जोमाने करीत आहेत. याबरोबरच विविध गावांतील महिलांना गुरांची काळजी घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून जिल्ह्यातील ४५ गावांत सध्या या महिला पशुसखी म्हणून कार्यरत आहेत. यासर्व लघू उद्योगामुळे शहराबरोबच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून जिल्ह्यातील या बचत गटांच्या महिलांनी आजवर १२ कोटी ९ लाखांची एकूण बचत केली आहे.

1 अनेकदा महिलांना अचानक पैशाची गरज पडते. त्यावेळी हेच बचतगट या महिलांसाठी धावून जात असल्याचे दिसून येते. मागील काही वर्षांत जिल्ह्यातील बचत गटांनी तब्बल ९६ कोटी ७० लाख एवढ्या रकमेची अंतर्गत उलाढाल केली आहे़2 विशेष म्हणजे, बचत गटाच्या व्याजदराप्रमाणे अवघ्या २ टक्क्यांत गरजूंना कर्ज उपलब्ध होत असल्याने संकटकाळी हे गट महिलांना मोठा दिलासा देणारे ठरत आहेत.3 पिंपळगाव परिसरात असलेल्या सुमारे २० बचत गटांना तर वार्षिक एक ते दीड लाख व्याज मिळू लागले असल्याने या गटांनी आता बँकेला आम्हाला कर्ज नको म्हणून सांगण्यास सुरूवात केली आहे.परतफेडीचे प्रमाण ९९ टक्केकर्ज वसुली हा बँकिंग क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा कर्ज वसुली होत नसल्याने कर्जदार संकटात येतोच. याचबरोबर थकित कर्जामुळे पतसंस्था बँकांनाही टाळे ठोकण्याची वेळ आल्याचे दिसून येते. मात्र, महिला बचत गटांना वितरीत केलेले कर्ज हमखास वसूल होते असेच या बचत गटांच्या व्यवहाराकडे पाहिले असता निदर्शनास येते. बचत गटांनी तब्बल ४५ कोटींहून अधिकची कर्जे घेतली असली तरीही या कर्जाची परतफेड ही तितक्याच प्रामाणिकपणे केल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बचत गटांच्या कर्ज परतफेडीचे प्रमाण हे ९९ टक्के आहे.महिला बचत गटामुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिक सक्षम होत असून त्या कुटुंबासाठी आधार ठरत आहेत. ही चळवळ जिल्ह्यात अधिक गतिमान व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बचत गटांना कृषी अवजारे मिळावीत, गारमेंट सेंटरला साहित्य द्यावे, मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसाराचे काम मिळावे तसेच बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान या गटांच्या माध्यमातून राबवावे आदी प्रस्ताव प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यास ही चळवळ आणखी बळकट होईल. - चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ.