शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी आत्मविश्वासाने उद्योगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 01:16 IST

परिवर्तनवादी महामानवांच्या आणि महानायिकांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठा समाजातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर होवून स्वावलंबी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशनातील यशस्वी उद्योजिका, वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले़

ठळक मुद्देजिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महाअधिवेशन : दुसऱ्या सत्रात मान्यवर उद्योजिका महिलांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : परिवर्तनवादी महामानवांच्या आणि महानायिकांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठा समाजातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर होवून स्वावलंबी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशनातील यशस्वी उद्योजिका, वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले़शहरातील कै़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या दुस-या सत्रात ‘स्त्री एक संपूर्ण ओळख व व्यक्तिमत्त्व विकास, महिलांनो उद्योजक व्हा’ या विषयावर विविध मान्यवर महिलांनी आपले विचार मांडले़दुसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ़सुनीता कदम तर प्रशिक्षक उषाताई इंगोले पाटील, मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़शुभांगी देवसरकर, डॉ़सोनिया उमरेकर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ़रेखा पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील रावणगावकर, जि़ प़ सदस्या डॉ़मीनल पाटील खतगावकर, डॉ़नम्रता तरोडेकर, डॉग़ायत्री वाडेकर, डॉ़शीतल भालके आदींची प्रमुख उपस्थिती होती़महिलांना उद्योजिका कशाप्रकारे व्हायचे आणि यशस्वी उद्योजकाचे सूत्र बिझिनेस कोच ट्रेनर उषा पाटील यांनी सविस्तर सांगितले. इंगोले म्हणाल्या, उद्योगामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे नियोजन आणि छोटी गुंतवणूक करून उद्योग सुरू करा़ एकट्याला शक्य नसेल तर समूह बनवून थोडे थोडे पैसे टाकून उद्योग, व्यापार सुरू करून त्यात यशस्वी होण्यासाठी उत्पन्न ते मार्केटिंग या सर्व बाबी स्वत: करणे गरजेचे आहे़ उद्योग लहान असो वा मोठा असो त्याची प्रसिद्धी, प्रचार योग्य पद्धतीने होणे काळाची गरज असून लोकांना हवं ते उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योगाील बना, असे आवाहन उषा इंगोले यांनी केले़ तसेच वेगवेगळी उदाहरणे देवून यशस्वी उद्योजिका होण्याचे सूत्र महिलांना सांगितले़ वेगवेगळ्या चित्रफिती दाखवून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले़डॉ़मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या, पुरूषप्रधान संस्कृती यासह विविध नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवावा़ कोणत्याही क्षेत्रात एकमेकांचे पाय न ओढता आजच्या मार्गदर्शनातून सकारात्मक बोध घेऊन चिंतन करावे आणि प्रगती साधावी, असे आवाहन डॉ़पाटील यांनी केले़यानंतर झालेल्या सत्रात गृहिणी, मध्यमवर्ग अनुभव, अपेक्षा, सूचना व मराठा महिलांसमोरील आव्हाने व कृतिशील उपाय या विषयावरील चर्चासत्रात वंदना घोगरे, अनुराधा देशमुख, शिल्पा देशमुख, मायाताई गावंडे, संगीता दांडेगावकर, साधना देशमुख, वंदना चव्हाण यांनी सहभाग घेतला़ विचारवंत गंगाधर बनबरे यांनी ‘सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील महिलांचे स्थान व आजची गरज, समस्या व उपाय, शिवधर्म’ यावर मार्गदर्शन केले. तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीचा कार्यक्रम झाला़ सूत्रसंचालन डॉ़ उषा कदम यांनी केले. सरस्वती धोपटे यांनी आभार मानले़निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराची गरजडॉ. शुभांगी देवसरकर आणि डॉ.सोनिया उमरेकर यांनी ‘स्त्री एक संपूर्ण ओळख सर्व अंगाने महिलांच्या शारीरिक समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले़ डॉ़देवसरकर म्हणाल्या, आहार आणि विहार योग्य नसल्याने आजार वाढत आहेत़ त्यामुळे महिलांनी उपासतापास सोडून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे़ मुलीमध्ये वाढत्या वयानुसार होणारे बदल लक्षात घेऊन आईने मुलीला मैत्रिणीची वागणूक दिली पाहिजे़ आई-मुलींचे नाते एवढे घट्ट असावे की तिने संपूर्ण बदल, आजाराविषयी नि:संकोचपणे आपल्याकडे व्यक्त झाले पाहिजे़

महिलांनी आत्मविश्वासाने उद्योगाकडे वळावेजिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महाअधिवेशन : दुसऱ्या सत्रात मान्यवर उद्योजिका महिलांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : परिवर्तनवादी महामानवांच्या आणि महानायिकांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठा समाजातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर होवून स्वावलंबी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशनातील यशस्वी उद्योजिका, वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले़शहरातील कै़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या दुसºया सत्रात ‘स्त्री एक संपूर्ण ओळख व व्यक्तिमत्त्व विकास, महिलांनो उद्योजक व्हा’ या विषयावर विविध मान्यवर महिलांनी आपले विचार मांडले़दुसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ़सुनीता कदम तर प्रशिक्षक उषाताई इंगोले पाटील, मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़शुभांगी देवसरकर, डॉ़सोनिया उमरेकर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ़रेखा पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील रावणगावकर, जि़ प़ सदस्या डॉ़मीनल पाटील खतगावकर, डॉ़नम्रता तरोडेकर, डॉग़ायत्री वाडेकर, डॉ़शीतल भालके आदींची प्रमुख उपस्थिती होती़महिलांना उद्योजिका कशाप्रकारे व्हायचे आणि यशस्वी उद्योजकाचे सूत्र बिझिनेस कोच ट्रेनर उषा पाटील यांनी सविस्तर सांगितले. इंगोले म्हणाल्या, उद्योगामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे नियोजन आणि छोटी गुंतवणूक करून उद्योग सुरू करा़ एकट्याला शक्य नसेल तर समूह बनवून थोडे थोडे पैसे टाकून उद्योग, व्यापार सुरू करून त्यात यशस्वी होण्यासाठी उत्पन्न ते मार्केटिंग या सर्व बाबी स्वत: करणे गरजेचे आहे़ उद्योग लहान असो वा मोठा असो त्याची प्रसिद्धी, प्रचार योग्य पद्धतीने होणे काळाची गरज असून लोकांना हवं ते उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योगाील बना, असे आवाहन उषा इंगोले यांनी केले़ तसेच वेगवेगळी उदाहरणे देवून यशस्वी उद्योजिका होण्याचे सूत्र महिलांना सांगितले़ वेगवेगळ्या चित्रफिती दाखवून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले़डॉ़मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या, पुरूषप्रधान संस्कृती यासह विविध नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवावा़ कोणत्याही क्षेत्रात एकमेकांचे पाय न ओढता आजच्या मार्गदर्शनातून सकारात्मक बोध घेऊन चिंतन करावे आणि प्रगती साधावी, असे आवाहन डॉ़पाटील यांनी केले़यानंतर झालेल्या सत्रात गृहिणी, मध्यमवर्ग अनुभव, अपेक्षा, सूचना व मराठा महिलांसमोरील आव्हाने व कृतिशील उपाय या विषयावरील चर्चासत्रात वंदना घोगरे, अनुराधा देशमुख, शिल्पा देशमुख, मायाताई गावंडे, संगीता दांडेगावकर, साधना देशमुख, वंदना चव्हाण यांनी सहभाग घेतला़ विचारवंत गंगाधर बनबरे यांनी ‘सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील महिलांचे स्थान व आजची गरज, समस्या व उपाय, शिवधर्म’ यावर मार्गदर्शन केले. तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीचा कार्यक्रम झाला़ सूत्रसंचालन डॉ़ उषा कदम यांनी केले. सरस्वती धोपटे यांनी आभार मानले़निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराची गरजडॉ. शुभांगी देवसरकर आणि डॉ.सोनिया उमरेकर यांनी ‘स्त्री एक संपूर्ण ओळख सर्व अंगाने महिलांच्या शारीरिक समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले़ डॉ़देवसरकर म्हणाल्या, आहार आणि विहार योग्य नसल्याने आजार वाढत आहेत़ त्यामुळे महिलांनी उपासतापास सोडून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे़ मुलीमध्ये वाढत्या वयानुसार होणारे बदल लक्षात घेऊन आईने मुलीला मैत्रिणीची वागणूक दिली पाहिजे़ आई-मुलींचे नाते एवढे घट्ट असावे की तिने संपूर्ण बदल, आजाराविषयी नि:संकोचपणे आपल्याकडे व्यक्त झाले पाहिजे़

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडNandedनांदेड