शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पाणवठे आटल्याने वन्य जीव रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:36 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत.

ठळक मुद्देशिकारी वाढल्या वनविभागाचे दुर्लक्ष, पाणवठ्याचे व्यवस्थापन नाही

श्रीक्षेत्र माहूर : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्य जिवाच्या शिकारीही केल्या जात आहे़ असे असले तरी वनविभाग मात्र याविषयी अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वन्यजीव जंगलाबाहेर पडू नये यासाठी वनविभागाच्या वतीने माहूर तालुक्यातील जंगल शिवारामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले़ मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी या पाणवठ्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या पाणवठ्यामध्ये नियमित पाण्याची व्यवस्था केली जाते किंवा नाही हादेखील संशोधनाचा विषय ठरला आहे. माहूर तालुक्यातील जंगल शिवारामध्ये वन्यजिवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बिबट्या, हरीण, मोर, ससे, रानडुक्कर, रोही, नीलगाय यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वन्यजिवांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव अनेकदा लोकवस्तीकडे धाव घेतात़ त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते़हा संघर्ष टाळण्यासाठी माहूर वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजना गांभीर्याने केल्या जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते़ परिणामी गेल्या काही वर्षांत माहूर तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात अनेकजण बळी ठरले होते.माहूर तालुक्यात अस्वलाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधत हे अस्वल लोकवस्त्यापर्यंत पोहोचतात़ त्यातून गंभीर घटना घडतात. जंगलात असलेल्या पाणवठ्याची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती झाल्यास मानव व वन्यजीव संघषार्ला पूर्णविराम मिळू शकतो़ परंतु, पाणवठ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. वाई बा.ते वानोळा रस्त्यावर अनेकदा वन्यजिवाचे दर्शन होते़ या भागात मोरांचीही संख्या जास्त आहे़मोर व सशांवर शिकाऱ्यांचा डोळामाहूर तालुक्यातील जंगलामध्ये मोर व सशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या दोन प्राण्यांवर शिकाºयांचा कायम डोळा असतो. या प्राण्याच्या मांसाला जास्त किंमत मिळत असल्याने त्याची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा गोरखधंदा पवनाळा, हडसनी, मेंडकी, मुंगशी, तांदळा, दिगडी धा.या परिसरात मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याची चर्चा आहे. हा भाग दुर्गम असल्याने या प्रकाराकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या शिकारीमुळे प्राण्याची संख्या कमी होण्याची भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई