शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पाणवठे आटल्याने वन्य जीव रस्त्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 00:36 IST

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत.

ठळक मुद्देशिकारी वाढल्या वनविभागाचे दुर्लक्ष, पाणवठ्याचे व्यवस्थापन नाही

श्रीक्षेत्र माहूर : यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने जानेवारी महिन्यातच जंगलातील पाणवठे आटल्यामुळे वन्यजीव पाण्याच्या शोधात रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून या वन्य जिवाच्या शिकारीही केल्या जात आहे़ असे असले तरी वनविभाग मात्र याविषयी अद्यापही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.वन्यजीव जंगलाबाहेर पडू नये यासाठी वनविभागाच्या वतीने माहूर तालुक्यातील जंगल शिवारामध्ये कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले़ मात्र, देखभाल व दुरुस्तीअभावी या पाणवठ्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. या पाणवठ्यामध्ये नियमित पाण्याची व्यवस्था केली जाते किंवा नाही हादेखील संशोधनाचा विषय ठरला आहे. माहूर तालुक्यातील जंगल शिवारामध्ये वन्यजिवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बिबट्या, हरीण, मोर, ससे, रानडुक्कर, रोही, नीलगाय यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने या वन्यजिवांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.पाण्याच्या शोधात वन्यजीव अनेकदा लोकवस्तीकडे धाव घेतात़ त्यातून मानव-वन्यजीव संघर्षाची ठिणगी पडते़हा संघर्ष टाळण्यासाठी माहूर वनविभागाकडून कोणत्याही उपाययोजना गांभीर्याने केल्या जात नसल्याचे दरवर्षीच दिसून येते़ परिणामी गेल्या काही वर्षांत माहूर तालुक्यात अस्वलाच्या हल्ल्यात अनेकजण बळी ठरले होते.माहूर तालुक्यात अस्वलाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याच्या शोधत हे अस्वल लोकवस्त्यापर्यंत पोहोचतात़ त्यातून गंभीर घटना घडतात. जंगलात असलेल्या पाणवठ्याची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती झाल्यास मानव व वन्यजीव संघषार्ला पूर्णविराम मिळू शकतो़ परंतु, पाणवठ्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. वाई बा.ते वानोळा रस्त्यावर अनेकदा वन्यजिवाचे दर्शन होते़ या भागात मोरांचीही संख्या जास्त आहे़मोर व सशांवर शिकाऱ्यांचा डोळामाहूर तालुक्यातील जंगलामध्ये मोर व सशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या दोन प्राण्यांवर शिकाºयांचा कायम डोळा असतो. या प्राण्याच्या मांसाला जास्त किंमत मिळत असल्याने त्याची शिकार करून त्याचे मांस विकण्याचा गोरखधंदा पवनाळा, हडसनी, मेंडकी, मुंगशी, तांदळा, दिगडी धा.या परिसरात मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्याची चर्चा आहे. हा भाग दुर्गम असल्याने या प्रकाराकडे वनविभागाचे कायम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या शिकारीमुळे प्राण्याची संख्या कमी होण्याची भीती वन्यजीव प्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई