शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण

By शिवराज बिचेवार | Updated: June 21, 2024 16:40 IST

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुुरु झाला आहे. मात्र सामाजिक संघर्ष होवू नये अशा दोन्हीकडच्या मागण्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे.

नांदेड- वाढीव आरक्षणाबाबत बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल अस मानायच काही कारण नाही. कारण सुक्रे समितीने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला आहे. अशी प्रतिक्रिया खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली. 

पाटणा उच्च न्यायालयाने बिहार सरकारने दिलेले वाढीव आरक्षण रद्द करण्याचा निर्णय गुरुवारी दिला. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण टिकेल काय? या विषयावर चव्हाण म्हणाले, सुप्रिम कोर्टाने निर्णय घेताना सांगितले आहे की, अपवादात्मक स्थितीमध्ये एखादा समाज मागासलेला म्हणून सिद्ध होत असेल तर त्या बाबतीत विचार करता येतो. महाराष्ट्राच्या प्रकरणात सुक्रे समितीने जो रिपोर्ट दिला आहे की मराठा समाज कसा मागासलेला आहे हे सिद्ध करुन तो दिला आहे. तो अहवाल सरकारे स्विकारला आहे. त्यामुळे अजून काही वाद नाही. एखादा विषय आलाच न्यायालयात तर आपल प्रकरण न्यायिक असल्याचे खासदार चव्हाण म्हणाले.

सामाजिक संघर्ष होवू नये यासाठी प्रयत्नराज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुुरु झाला आहे. मात्र सामाजिक संघर्ष होवू नये अशा दोन्हीकडच्या मागण्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले आहे, बाकीची प्रक्रिया सुरु आहे. मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे आम्ही या मताचे आहोत. त्या पद्धतीने सरकार कार्यवाही करीत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये अशी ओबींसीची मागणी आहे. दोघांमध्ये समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे खासदार चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणNandedनांदेडState Governmentराज्य सरकार