शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:41 IST

गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता मरखेल परिसरात पाण्याचा अन् चाऱ्याचा प्रश्न गंभीर

मरखेल : गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. एक टाकी पाण्यासाठी १५० ते २०० रुपये तर कडब्याची पेंडी १५ रुपयाला बाजारात मिळत आहे.मरखेल परिसरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तापमान ४० अंशावर गेले आहे. मार्च महिन्यातच नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एक बॅरेल पाण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत असल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड झाले असून पशुधन विक्रीस काढण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारील कर्नाटक राज्यातील औराद येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे नेली जात असून त्याची कवडीमोल दराने विक्री केली जात आहे. असमाधानकारक पावसामुळे चार-पाच वर्षांपासून शेतीतून पुरेसे उत्पन्न न निघाल्यामुळे व खाजगी सावकाराचे घेतलेले कर्ज वाढत चालल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असून दुष्काळावर मात करण्यासाठी फसव्या पॅकेजऐवजी दीर्घकालीन उपाययोजना करून शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठेबरोबर अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे.शेतकºयाचा सध्या नगदी पिकाकडे जास्त कल असल्यामुळे ज्वारीचे पेरा क्षेत्र कमी झाले. परतीच्या पावसाने यंदा दगा दिल्याने काही प्रमाणात होणाºया रबीच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्यामुळे कडब्याचे दर वाढले आहे़ हायब्रीड ज्वारीच्या कडब्याची पेंडी दहा ते पंधरा रुपये दराने मिळत असून टाळकी (बडी) ज्वारीची पेंडी वीस रुपयाला एक या दरात खरेदी करावे लागत असल्यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. चाराछावण्या व टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.तीव्र टंचाईमुळे नळाला चार-चार दिवस पाणी येत नाही व सार्वजनिक विहिरीजवळ सांडपाण्यामुळे झालेली दुर्गंधी यामुळे बाटलीबंद पाण्याला ‘अच्छे दिन’ आले. वीस लिटरच्या जारला पंधरा रुपये मोजावे लागताहेत़ विना परवाना हा व्यवसाय बिनबोभाट सुरु असून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विनाप्रमाणित पाणी बाटलीबंद करून विकले जात आहे़ यातून दरमहा लाखोंची उलाढाल होत आहे.

टॅग्स :nanded-pcनांदेडdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई