शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:41 IST

गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता मरखेल परिसरात पाण्याचा अन् चाऱ्याचा प्रश्न गंभीर

मरखेल : गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. एक टाकी पाण्यासाठी १५० ते २०० रुपये तर कडब्याची पेंडी १५ रुपयाला बाजारात मिळत आहे.मरखेल परिसरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तापमान ४० अंशावर गेले आहे. मार्च महिन्यातच नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एक बॅरेल पाण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत असल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड झाले असून पशुधन विक्रीस काढण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारील कर्नाटक राज्यातील औराद येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे नेली जात असून त्याची कवडीमोल दराने विक्री केली जात आहे. असमाधानकारक पावसामुळे चार-पाच वर्षांपासून शेतीतून पुरेसे उत्पन्न न निघाल्यामुळे व खाजगी सावकाराचे घेतलेले कर्ज वाढत चालल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असून दुष्काळावर मात करण्यासाठी फसव्या पॅकेजऐवजी दीर्घकालीन उपाययोजना करून शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठेबरोबर अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे.शेतकºयाचा सध्या नगदी पिकाकडे जास्त कल असल्यामुळे ज्वारीचे पेरा क्षेत्र कमी झाले. परतीच्या पावसाने यंदा दगा दिल्याने काही प्रमाणात होणाºया रबीच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्यामुळे कडब्याचे दर वाढले आहे़ हायब्रीड ज्वारीच्या कडब्याची पेंडी दहा ते पंधरा रुपये दराने मिळत असून टाळकी (बडी) ज्वारीची पेंडी वीस रुपयाला एक या दरात खरेदी करावे लागत असल्यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. चाराछावण्या व टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.तीव्र टंचाईमुळे नळाला चार-चार दिवस पाणी येत नाही व सार्वजनिक विहिरीजवळ सांडपाण्यामुळे झालेली दुर्गंधी यामुळे बाटलीबंद पाण्याला ‘अच्छे दिन’ आले. वीस लिटरच्या जारला पंधरा रुपये मोजावे लागताहेत़ विना परवाना हा व्यवसाय बिनबोभाट सुरु असून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विनाप्रमाणित पाणी बाटलीबंद करून विकले जात आहे़ यातून दरमहा लाखोंची उलाढाल होत आहे.

टॅग्स :nanded-pcनांदेडdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई