शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

२०० रुपयांना पाण्याची टाकी, १५ रुपयांना कडब्याची पेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:41 IST

गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून

ठळक मुद्देदुष्काळाची दाहकता मरखेल परिसरात पाण्याचा अन् चाऱ्याचा प्रश्न गंभीर

मरखेल : गत पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भूजलपातळी खालावली असून परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच मरखेल परिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. एक टाकी पाण्यासाठी १५० ते २०० रुपये तर कडब्याची पेंडी १५ रुपयाला बाजारात मिळत आहे.मरखेल परिसरात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून तापमान ४० अंशावर गेले आहे. मार्च महिन्यातच नाले, तलाव व विहिरी कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. एक बॅरेल पाण्यासाठी दीडशे ते दोनशे रुपये मोजावे लागत असल्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड झाले असून पशुधन विक्रीस काढण्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेजारील कर्नाटक राज्यातील औराद येथे विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात जनावरे नेली जात असून त्याची कवडीमोल दराने विक्री केली जात आहे. असमाधानकारक पावसामुळे चार-पाच वर्षांपासून शेतीतून पुरेसे उत्पन्न न निघाल्यामुळे व खाजगी सावकाराचे घेतलेले कर्ज वाढत चालल्यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येसाठी प्रवृत्त होत असून दुष्काळावर मात करण्यासाठी फसव्या पॅकेजऐवजी दीर्घकालीन उपाययोजना करून शेतीमालाला हमीभाव व बाजारपेठेबरोबर अल्प व्याजदराने कर्जपुरवठा करणे गरजेचे आहे.शेतकºयाचा सध्या नगदी पिकाकडे जास्त कल असल्यामुळे ज्वारीचे पेरा क्षेत्र कमी झाले. परतीच्या पावसाने यंदा दगा दिल्याने काही प्रमाणात होणाºया रबीच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्यामुळे कडब्याचे दर वाढले आहे़ हायब्रीड ज्वारीच्या कडब्याची पेंडी दहा ते पंधरा रुपये दराने मिळत असून टाळकी (बडी) ज्वारीची पेंडी वीस रुपयाला एक या दरात खरेदी करावे लागत असल्यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे. चाराछावण्या व टँकरद्वारे पाणीपुरवठा करून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.तीव्र टंचाईमुळे नळाला चार-चार दिवस पाणी येत नाही व सार्वजनिक विहिरीजवळ सांडपाण्यामुळे झालेली दुर्गंधी यामुळे बाटलीबंद पाण्याला ‘अच्छे दिन’ आले. वीस लिटरच्या जारला पंधरा रुपये मोजावे लागताहेत़ विना परवाना हा व्यवसाय बिनबोभाट सुरु असून शुद्ध पाण्याच्या नावाखाली विनाप्रमाणित पाणी बाटलीबंद करून विकले जात आहे़ यातून दरमहा लाखोंची उलाढाल होत आहे.

टॅग्स :nanded-pcनांदेडdroughtदुष्काळwater shortageपाणीटंचाई