शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

नांदेड शहराला विष्णूपुरीसह आसना नदीतूनही पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 16:39 IST

शहराला आता विष्णूपुरीसह आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनेतूनही पाणीपुरवठा केला जात आहे.

ठळक मुद्दे लोअर दुधना प्रकल्पातून घेण्यात आलेल्या २५ दलघमी पाण्यापैकी जवळपास १५ दलघमी पाणी विष्णुपुरीत उपलब्ध झाले.

नांदेड : शहराची तहान भागविण्यासाठी लोअर दुधना प्रकल्पातून घेण्यात आलेल्या २५ दलघमी पाण्यापैकी जवळपास १५ दलघमी पाणी विष्णुपुरीत उपलब्ध झाले. त्याचवेळी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातूनही १ दलघमी पाणी घेण्यात आले आहे. त्यामुळे  शहराला आता विष्णूपुरीसह आसना नदीवरील पर्यायी पाणीपुरवठा योजनेतूनही पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी उन्हाळ्याच्या अंतिम टप्प्यातही शहरात नियोजित पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे.

विष्णूपुरी प्रकल्प तळाशी गेल्यानंतर प्रारंभी डिग्रस बंधाऱ्यातून २० दलघमी पाणी घेण्यात आले होते.  त्यानंतर मार्चमध्ये सिद्धेश्वर प्रकल्पातूनही १० दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यानंतर उर्ध्वपैनगंगा प्रकल्पातील पाणी शहरासाठी घेण्यात आले. मे मध्ये पुन्हा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा २५ दलघमी पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून राहाटी बंधाऱ्यामार्गे घेण्यात आले. त्यामुळे शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. 

दरम्यान, रमजान महिनाही मेच्या मध्यानंतर सुरू झाला. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल न करण्याचा निर्णय महापौर शिला भवरे यांनी घेतला होता. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करुन दोन ऐवजी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या हालचाली सुरू होत्या. शहरातील पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकाबाबत नागरिकांची मोठी ओरड होती. मात्र नूतन आयुक्त लहुराज माळी यांनी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच तयार केले. या वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले. मात्र काही वेळा वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक प्रभावीत होत असल्याचे ते म्हणाले.

दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे कोटतीर्थ परिसरातील वीज पुरवठा तब्बल ३२ तास बंद झाला होता. त्याचा शहरातील पाणी पुरवठ्यावर निश्चितपणे परिणाम झाला. मात्र सध्या शहराला पर्यायी पाणीपुरवठा योजनेद्वारेही पाणी उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यामुळे फारसा परिणाम झाला नाही. आसना नदीत उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील १ दलघमी पाणी २१ मे पासून सोडण्यात आले आहे. त्यामुळे शहरासाठीची पर्यायी पाणीपुरवठा योजना २३ मे पासून सुरू झाली आहे. परिणामी शहराला विष्णूपुरीसह आसनेतूनही पाणीपुरवठा केला जात आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी वेळेत उपलब्ध होत असल्यानेही नागरिकही समाधानी होत आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे आभार !शहरात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरुन मोठी ओरड सुरू होती. अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा आदी विषयावरुन पाणीपुरवठा विभागाच्या नावाने ओरड विविध भागातून सुरू होती. त्यात नगरसेवकही संतप्त झाले होते. अखेर आयुक्त माळी यांनी आपल्या पहिल्याच सभेत नगरसेवकांना शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रकच दिले. त्या वेळापत्रकाची अंमलबजावणीही सुरू झाली. या सर्व बाबीचा सकारात्मक परिणाम पुढे आला आहे. जुन्या नांदेडातील शक्तीनगर येथील नागरिकांनी मंगळवारी महापालिकेत येऊन पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त केले. हा अनुभव पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला. 

टॅग्स :vishnupuri damविष्णुपुरी धरणriverनदीWaterपाणी