शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

विष्णूपुरीतून सिंचनासाठी पाणी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:24 IST

विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग पाण्याच्या कमतरतेमुळे दुसरी पाळी अनिश्चित

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाणीपाळी गुरुवारपासून सोडण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत हे पाणी सोडले जाणार असून दुसरी पाणीपाळी मात्र अनिश्चित असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचवेळी नांदेड शहराचा पाणीपुरवठाही विष्णूपुरी प्रकल्पावरच आधारित आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील उपलब्ध जलसाठा पाहता नांदेडकरांवर जलसंकटच ओढावले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे धोरण लक्षात घेता विष्णूपुरी प्रकल्पातून सिंचनासाठी पहिली पाणीपाळी सोडण्यात आली असली तरी दुसरी पाणी पाळी मात्र अनिश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. यावरच पिकाचे नियोजन करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला गोदावरीच्या दोन्ही किणाऱ्यावरुन शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीउपसा होत आहे. त्याचवेळी विष्णूपुरीत गेल्या महिनाभरात २३ दलघमी पाणी कमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी १६ नोव्हेंबरपासून प्रशासनाची पथके रवाना होणार आहेत. अवैधरित्या पाणीउपसा करणारे विद्युतपंप जप्त केले जाणार आहेत. त्याचवेळी महावितरणकडून प्रकल्प क्षेत्रातील रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.दरम्यान, महापालिकेने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. शहराला आता दिवसाआड होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड केले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. विष्णूपुरीतील जलसाठा संपल्यानंतर पर्यायी व्यवस्था नसल्याने महापालिकेसह जिल्हा प्रशासनही चिंतीत झाले आहे. विष्णूपुरीत पाणी घेण्यासाठी असलेले येलदरी आणि सिद्धेश्वर हे दोन्ही पर्याय कोरडे पडले आहेत. त्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवावा, यासाठी नियोजन केले जात आहे.

टॅग्स :NandedनांदेडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पvishnupuri damविष्णुपुरी धरणwater shortageपाणीटंचाई