शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:54 IST

मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे.

ठळक मुद्देकळमनुरी : आराखड्याला निवडणुकीचा खोडा

कळमनुरी : मार्च महिन्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. शिवाय ढगाळ वातावरण असल्याने उकाडा जाणवत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे पाणीटंचाई वाढली आहे. पं.स.ने बनविलेला संभाव्य पाणीटंचाई आराखडा कागदावरच असल्याचे दिसत आहे.तालुक्यातील ६० ते ७० गावांत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासन लोकसभा निवडणूकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीने ४ कोटी ७३ लाखांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून तो मंजूरही करून घेतला आहे. टँकरने पाणीपुरवठा व अधिग्रहण वगळता इतर कोणत्याही पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना होत नाहीत.हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे जारच्या पाण्याची मागणी वाढली असून त्यांचा धंदा मात्र सध्या तेजीत सुरू आहे. खरीप हंगामानेही यावर्षी दगा दिला. खाण्यासाठी अन्न व पिण्यासाठी पाणी नसल्याचे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे. तात्पुरती पूरक नळयोजना, नळ योजना दुरूस्ती, विधन विहिरीची दुरूस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे आदी कामांना संभाव्य आराखड्यात मंजुरी मिळाली आहे. परंतु ही कामे अजूनही कागदावरच आहे. त्यामुळे अनेक गावांत गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून तालुक्यातील नांदापूर येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेतंर्गत ६८ लाखांचे नळ योजनेचे काम सुरू आहे. निवडणूकीच्या कामामुळे पाणीटंचाईकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यात दुष्काळ व पाणीटंचाईची दाहकता वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.अधिग्रहण प्रस्ताव : मंजुरी मिळूनही धूळ खातसध्या तालुक्यातील शिवणी खु., माळधावंडा, हातमाली, पाणबुडीवस्ती, पोत्रा, सिदगी, महालिंगीतांडा, कुपटी या आठ गावांना १० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ४० गावांत ५० अधिग्रहणाला प्रशासनाने मंजुरी दिली आहे. अजूनही १५ ते २० अधिग्रहणाचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या हंगामात ७९ टक्केच पाऊस पडला. आॅगस्ट महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जलस्त्रोत कोरडे ठाक पडले आहेत. तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.३५ नळ योजना बंदतालुक्यातील ३५ नळ योजना किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत. तालुक्यात एकूण १ हजार ७५ हातपंप असून त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त हातपंप किरकोळ दुरूस्तीअभावी बंद आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई